नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आज आपण बघणार आहोत. पायाला पडलेल्या भेगा किंवा चिखल्या घालवण्यासाठी चे उपाय –
पावसाच्या दिवसात असंख्य व्यक्तींचे पाय ओले राहतात. चप्पल शूज घालून ही पाय ओले राहतात. त्यामुळे पायाला भेगा पडतात. अशा व्यक्तींनी घरी आल्यावर आपले पाय स्वच्छ धुणे आवश्यक असते.
आपल्या शरीराची सर्व जबाबदारी ही मुख्यतः पायांवर असते असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये.पायावर सर्व शरीराचा तोल सांभाळला जातो.पाय आपल्या शरीराची काळजी घेतात.
मात्र आपण पायांची संपूर्ण काळजी घेत नाही.आपण केवळ पायाच्या वरील भागास मॉइश्चराइझ लावतो मात्र खालील भाग मुख्यत्वे टाचांची काळजी घेत नाही. यामुळे येथे डेड सेल्स वाढणे,मुग्या येणे,भेगा पडणे अशा समस्या निर्माण होतात.
त्या दिवसांमध्ये आपल्या बाळाची स्वच्छता खूप उपयुक्त ठरते. कोणताही उपाय करा त्यासाठी पाय स्वच्छ धुऊन पायावरची डेड स्कीन काढून टाकणं असतं. चिखल्या किंवा भेगांवर करण्यासाठी वनस्पती ची गरज असते ती वनस्पती म्हणजे वडाचे झाड.
आयुर्वेदामध्ये वटवृक्षाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वडाचा जो कोंब किंवा डेर असतो. तो तोडायचा आहे आणि त्यातून जो पांढरा चीक निघतो तो चीक पाय स्वच्छ धुवून भेगा पडलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी झोपताना लावायचा आहे.
सकाळी उठल्याबरोबर पाय मऊ पडतील. कसल्याही चिखल्या पूर्णतः गळून पडतील हा एक महत्त्वाचा उपाय आहे. चिखल्या नुकत्याच झाल्या असतील तरीही यावर हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
चुली मध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा चुलीमध्ये जो निखारा असतो त्यावर आपल्याला प्रयोग करायचा आहे. कोळसा पेटवून घेतल्यानंतर त्यावर तांदूळ टाकायचा आहे.
त्यातून जो धूर निघेल तर त्या धुरावर पाय धरायचा आहे. असं केल्याने चिखल्या पूर्णतः बऱ्या होतात. तुम्ही रोज झोपताना तीन दिवस हा उपाय करा, चिखल्या पूर्णता निघून जातील. असा हा एक महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय नक्की करून पहा.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला सुद्धा घेऊ शकता.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.