स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, आपल्या दैनंदिन जीवनात कित्येकदा अश्या काही घटना घडतात ज्यामुळे कधी आपल्याला फायदा होतो तर कधी नुकसान. धावपळीच्या या आयुष्यात आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहूनही न पाहिल्यासारख्या करतो.
कारण आपल्या डोक्यात सतत विचारांचे द्वंद्व सुरू असते. त्यामुळे आपण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी नीटपणे समजून घेऊ शकत नाही. शास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला अश्याकाही गोष्टी दिसल्या तर त्या तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतात तसेच तुम्हाला धनवानही बनवू शकतात.
परंतु मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आपले डोके शांत ठेवण्याची गरज आहे. शास्त्रामध्ये अश्या काही संकेतांचा उल्लेख केलेला आहे ज्यामुळे तुमचे नशीब चमकू शकते.आणि त्याचबरोबर मित्रांनो महत्त्वाच्या कामाला निघताना मनात शेकडो शंका कुशंका येतात. काम होईल का? संबंधित व्यक्ती भेटेल का? कामाला गती मिळेल का?
कामात अडथळे येतील का? असे नानाविध प्रश्न उपस्थित राहिले, की मनात शंकेची पाल चुकचुकते. नुसत्या विचाराने आपण गर्भगळीत होतो आणि भीतीने कामाची चालढकल करत आजचे काम उद्यावर रेटतो. परंतु, वेळेला अतिशय महत्त्व असते. निघून गेलेली वेळ आणि हातातून निसटलेली संधी परत येत नसते.
जर तुम्हाला तुमचा प्रवास शुभ आणि यशस्वी करायचा असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी आराध्य देवतेला धूप-दीप वगैरे दाखवा आणि प्रवास शुभ होण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर, सर्व अडथळ्यांचा नाश करणारा भगवान गणेश किंवा आपल्या प्रिय देवतेचे नाव घेतल्यानंतर घराच्या बाहेर पडा.
आणि त्याचबरोबर मित्रांनो प्रवासासाठी घर सोडताना स्वराची विशेष काळजी घ्या. घरातून बाहेर पडताना जो स्वर सुरु आहे, सर्वप्रथम तोच पाय बाहेर काढा. घरातून बाहेर पडताना नेहमी शुभ आणि मंगलदायक शब्द वापरा. कोणाशी वाद घालू नका किंवा रागावू नका आणि कोणाचाही गैरवापर करू नका.
आणि मित्रांनो प्रवासाला निघताना, वडिलांचे आशीर्वाद घेऊन निघा. असे मानले जाते की वडिलांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांमुळे मार्गातील अडथळे दूर होतात. प्रवासापूर्वी शकुन आणि अपशकुनांची विशेष काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रवासासाठी घर सोडत असाल.
तर वाटेत समोरुन कोणी शिंकले तर तुम्ही थोडा वेळ थांबा आणि मगच पुढच्या प्रवासासाठी निघा. प्रवासाला जाताना जर तुम्हाला वाटेत एखादे मंदिर, पवित्र झाड, गाय, बैल, आई-वडील, आजी आजोबा किंवा गुरुजी भेटले तर त्यांना नमस्कार करुन उजवीकडे सोडून पुढे जा. असे केल्याने प्रवास शुभ आणि यशस्वी होतो.
मित्रांनो कोणताही प्रवास करताना दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. उदाहरणार्थ, सोमवारी आणि शनिवारी पूर्वेला, उत्तरेत मंगळ आणि बुधवारी, पश्चिमेला रविवार आणि शुक्रवारी. त्याचप्रमाणे गुरुवारी दक्षिण दिशेला दिशाशूल मानला जातो. असे मानले जाते की त्या दिशेने प्रवास करताना एखाद्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते.
आणि महत्त्वाच्या कामालाच नाही, तर एरव्हीसुद्धा तुळशीचे पान खाऊन बाहेर पडणे शुभ मानले जाते. त्याच बरोबर आपल्या इष्ट देवतेची पूजा करून बाहेर पडावे आणि तसेच स्वमुख पाहणे देखील शुभ मानले जाते. स्वत:ला आरशात पाहून आपला आत्मविश्वास दुणावतो आणि कार्यपूर्तीचे बळ मिळते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!