मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी आपल्या मानवी समाजाच्या कल्याणाशी संबंधित अनेक धोरणं सांगितली आहेत. याच धोरणांचा स्वीकार करुनच चंद्रगुप्त मौर्य राजा झाला. मित्रांनो, आचार्य चाणक्य यांचं नाव भारतातील महान अभ्यासकांमध्ये गणले जाते.
त्यांची धोरणे आजच्या काळातही तितकीच प्रभावी ठरत आहेत, जितकी की ती इतिहासात प्रभावी होती. आचार्य चाणक्य यांच्या नितीमध्ये त्यांनी महिलांबाबत सविस्तरपणे सांगितले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की ते पुरुष अतिशय भाग्यवान असतात ज्यांच्या पत्नीमध्ये हे 5 गुण असतात…
मित्रांनो, आचार्य चाणक्य असे म्हणतात की अशी स्त्री जी नेहमी धर्माच्या मार्गावर चालत असते, तिच्या नवऱ्याचे जीवन नक्कीच यशस्वी होते.
जी स्त्री देवावर विश्वास ठेवते अशा स्त्रीच्या घरात नेहमी आनंद असतो आणि देवतांचे वास्तव्य नेहमीच त्यांच्या घरात जाणवत राहते. अशा घरात कधीही कोणत्याही प्रकारची अडचण किंवा बाधा येऊ शकत नाही.
आचार्य चाणक्य यांनी दुसऱ्या गुणाचे वर्णन करतांना असे सांगितले आहे की, जी स्त्री समाधानी असते त्या घरात कधीही कशाची क’मतरता भासणार नाही.
आचार्य चाणक्य असेही म्हणतात की ज्या स्त्रीमध्ये समाधानाची भावना असते आणि ज्या स्त्रिच्या इच्छा मर्यादित असतात ती साक्षात माता लक्ष्मीचे दुसरे रुप असते. त्या स्त्रीचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदाने व भरभराटीने भरलेले असते. अशा महिलेचा नवरा अतिशय भाग्यवान समजला जातो.
आचार्य चाणक्य यांनी तिसऱ्या गुणाबद्दल सांगतांना असे म्हटले आहे की, धैर्य किंवा संयम हा एका स्त्रीचा सर्वात प्रभावी गुण आहे. म्हणून जी स्त्री कठीणात कठीण परिस्थितीमध्ये न घाबरता त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाते, त्या स्त्रीचा नवरा देखील फारच भाग्यवान असतो.
मित्रांनो, आपल्या सुखी तथा आनंदी जीवनामध्ये धैर्य किंवा आपला संयम या गुणांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. जर तुमच्यात संयम असेल तर, एखादी व्यक्ती अगदी सहजपणे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकते.
आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, जी स्त्री शांत स्वभावाची आहे आणि जिला कुठल्याही गोष्टीचा जास्त राग येत नाही, तिचा पती देखील अतिशय भाग्यवान समजला जातो.
कारण आपण बघतो की रागाच्या भरात माणसाची विचारशक्ती संपून जाते आणि तो त्या भरात काहीतरी करुश बसतो, ज्याचा त्याला नंतर बराच त्रास सहन करावा लागतो. मित्रांनो, म्हणूनच राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो.
आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, ज्या महिलेच्या भाषेत गोडपणा असेल त्या महिलेचा नवरा सुद्धा भाग्यवान ठरतो. अशी स्त्री आपल्या नवऱ्याचे आयुष्यला एक स्वर्ग बनवत असते. अशी स्त्री आपल्या घरात आनंदी आणि शांततेचे वातावरण घेऊन येते.
टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!