वा’स्तूनियमांनुसार स्वयंपाकघर हा घराचा सर्वात महत्वाचा भाग असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयाकडे जाणारा मार्ग इथून जातो. जर कुणाच्या मनात स्थान मिळवायचं असेल तर त्याने समोरच्या व्यक्तीची आवडती डिश बनवून खायला द्यावी.
आणि तसही कुणीतरी म्हंटल आहे, एखाद्याच्या मनापर्यंत पोहचण्याचा रस्ता त्याच्या पो’टातून जातो. हिं’दू शा’स्त्रानुसार स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यांच्या कृपेनेच घरातील धान्य भांडार भरलेले आहेत. म्हणूनच, अन्नपूर्णा माते ची प्रतिमा स्वयंपाकघरात स्थापित करणं आवश्यक आहे.
घरात जे काही बनवलेले असेल त्याचा नैवेद्य पहिले अ’न्नपूर्णेला दाखवावा व नंतर घरातील इतरांनी खावे. असे केल्याने कुटुंबातील सर्व सदस्य नि’रो’गी राहतील. घरात अन्न आणि पै’शाचा प्रवाह नेहमीच कायम राहण्यासाठी, अन्नपूर्णा देवीला कोरडे धणे अर्पण करावे आणि ते अर्पण केलेले धणे स्वयंपाकघरात इतर कुठेही लपवून ठेवावे.
आपल्या घराला संरक्षक आवरण घालण्यासाठी, अन्नपूर्णा देवीला नवधान्याचा भोग लावून ते धान्य पक्षांसाठी ठेवावे.
प’त, प्र’सिद्धी मिळवण्यासाठी, अन्नपूर्णा देवीला मूग डाळीचा नैवेद्य दाखवून नंतर तो गायीला खायला घालावा.
फळ किंवा भाज्यांनी भरलेल्या टोपलीचे चित्र स्वयपांक घरात लावल्याने घरात सुखं नांदते.
स्वयंपाकघरातील वास्तुदो’ष दूर करण्यासाठी किचनच्या ईशान्य दिशेस सिंदुरी गणपती बाप्पाचा फोटो लावा.
धान, मूग, गहू, मोहरी, जव, काळी तिळ आणि ज्वारीची एकत्र करुन काही पोटली बनवा. जास्तीत जास्त खोल्यांमध्ये एक एक पोटली ठेवा. असे मानले जाते की हे सप्तधान्य घरात या पद्धतीने ठेवल्यास, घरातील अन्न तथा पै’शांचे भांडार कायम टिकवून ठेवण्यास मदत होते.
मान्यतेनुसार स्वयंपाकघरात चुल किंवा गॅ’स पूर्व दिशेला असणे चांगले मानले जाते. जर चुल नैऋत्य दिशेला असेल तथ आ’र्थिक स्थि’रता येते. असा विश्वास आहे की एखाद्या व्यक्तीस मोठ्या आ’र्थिक सं’कटाचा सा’मना करावा लागू शकतो.
घरातील गृहिणीला घराची अन्नपूर्णा मानलं जातं. त्यांनी बनवलेल्या स्वादिष्ट अन्नामुळे कुटुंबाचे पालन पोषण होते. त्यांनी काही गोष्टींची का’ळजी घ्यावी-
त्यांनी दररोज आंघोळ करून साफ व स्वच्छ कपडे परिधान करून नंतरच स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे.
स्वयंपाकघरात भेदभाव न करता सर्वांना समान भोजन करायला द्यावं. घरातील सर्व सदस्यांचे जेवण झाल्यानंतरच घरातील अन्नपूर्णेने जेवण करावे.
घरी आलेल्या अ’तिथींचा खाऊ पिऊ घातल्याशिवाय त्यांचा निरोप घेऊ नये किंवा त्यांची पाठवणी करु नये.
टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.