कुणाकडून चुकून सुद्धा मागू नका या वस्तू… घरदार होईल बरबाद.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! बऱ्याचदा आपण आपल्या पूर्वजांना म्हणजेच आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना शेजारी पाजारी राहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींकडून असं ऐकलं असेलच की दुसऱ्या लोकांच्या काही वस्तू आपण चुकूनही वापरू नयेत. मित्रांनो वास्तुशास्त्र सुद्धा या गोष्टीला दुजोरा देतं. आपल्या हिंदू धर्म शास्त्राने सुद्धा सांगितलेलं आहे की दुसऱ्यांच्या काही विशिष्ट वस्तू वापरल्याने आपल्या जीवनामध्ये वाईट वेळ सुरू होते. आपल्याला ग्रह दोष लागतात, आपल्या कुंडलीमध्ये दोष निर्माण होतात. तुम्हाला याचे दुष्परिणाम आता सध्या वर्तमान काळात जरी दिसले नाहीत तरीसुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या वरती मोठी संकटे येऊ शकतात. चला तर जाणून घेऊ या की अशा कोणत्या पाच वस्तू आहेत की ज्या आपण दुसऱ्यांकडे अजिबात मागू नयेत आणि अशा वस्तु वापरूही नयेत.

यातील पहिली गोष्ट आहे इतरांनी वापरलेले कपडेलत्ते. मग हे कपडे कोणतेही असू देत, तर दुसऱ्या व्यक्तीचे वापरलेले कपडे आपण अजिबात सुद्धा वापरू नयेत. त्याचप्रमाणे दुसऱ्याने वापरलेले अंथरून पांघरूण हे सुद्धा आपण वापरू नये. असं म्हणतात की दुसऱ्याचे कपडे वापरल्याने त्या व्यक्तीला असलेले दोष हे आपल्याला लागतात. त्या व्यक्तीला जे रोग असतील, आजार असतील हे सर्व रोग आणि आजार हे आपल्या पाठीमागे लागतात. तसेच त्या व्यक्तीच्या कुंडलीत असलेले दोष हे आपल्या माथी मारले जातात थोडक्यात काय तर कुंडली दोष सुद्धा निर्माण होतो. म्हणून दुसऱ्या व्यक्तीने वापरलेले कपडे किंवा दुसऱ्या व्यक्तीचा अंथरून आपण चुकूनही वापरू नये.

दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एखादं घर विकत घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही एखादी जुनी वास्तू विकत घेणार आहात. एखादी जुनी हवेली, घर, एखादा जुना बंगला, जे खूप दिवसांपासून पडून आहेत, ज्या मध्ये कोणीही राहिलेलं नाहीये, तर मित्रांनो त्या घराच्या बाबतीत संपूर्ण चौकशी करूनच आपण हे घर विकत घ्यावं. कारण जे घर जास्त दिवस बंद असते त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होते. अशा पडक्या घरात अनेक वाईट शक्ती वास करतात. त्यामुळे जुन्या जाणत्या माणसांकडे चौकशी करून मगच हे घर विकत घ्यायचं की नाही हे ठरवा. कारण त्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती हे आपलं जीवन बरबाद करू शकतात.

तसेच तिसरी गोष्ट म्हणजे दुसर्‍याने वापरलेल्या चपला अजिबात वापरू नका. तसेच दुसऱ्याने वापरलेले बूट सुद्धा अजिबात वापरू नयेत. दुसऱ्याचे चप्पल बूट वापरल्याने आपली कुंडली बिघडते. आपल्या कुंडलीमध्ये अनेक दोष निर्माण होतात. मित्रांनो आपल्या घरामध्ये पाहुणे वगैरे येतात त्यांच्या चपला पण घराच्या आत ठेवत असाल तर थोडी काळजी अवश्य घ्या. दुसऱ्याच्या चपला आपल्या घरात ठेवल्या तर त्याच्या सोबत त्यांच्या पाठी असलेले दोष, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतात. त्यामुळे आपली चालू असलेली कामं बंद पडतात. अशुभ गोष्टी घडायला लागतात. कोणतं कार्य करायला गेलं तर त्याच्यात अचानक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर एखादं चप्पल स्टॅण्ड जरूर ठेवावं.

चवथी गोष्ट वित्त किंवा पैसा बऱ्याच वेळी आपल्याला गरज पडते आणि आपण कोणाकडून तरी उधार पैसे घेतो, तर असे उसने घेतलेले पैसे हे वेळच्या वेळी त्या व्यक्तीला परत द्या. आपली गरज भागल्यानंतर आपल्याकडे पैसे येऊन सुद्धा आपण जर परत करायचं नाव काढत नसाल तर त्या व्यक्तीचे तळतळाट आपल्याला लागू शकतात. आपल्याला कोणाचे तळतळाट मिळत असतील तर अशा घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. त्यामुळे कोणाकडून पैसे उसणे घेतले असतील तर ते वेळीच परत करा. मित्रांनो या गोष्टी कधीच विसरू नका. यांचं पालन करा. या 4 गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्यांच्या कधीही वापरू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment