दर मंगळवारी घराच्या दारावर शिंपडा या वस्तुने बनलेलं मिश्रण.. नजर, बाधा लागणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो दर मंगळवारी आपल्या घराच्या दारावर आपण जर एक वस्तू पाण्यामध्ये मिक्स करून शिंपले तर आपल्या घराला आपल्याला कोणाचीही नजर लागणार नाही. त्यासोबतच घरातील कोणत्याही सदस्याला नजर बाधा, दुःख, कोणतेही दोष, बाहेरील पीडा घरामध्ये येणार नाही. कारण आपण प्रत्येक जणच आपल्या घराला आपल्याला कोणाचीही नजर लागू नये, म्हणून वेगवेगळे उपाय करत असतो.

त्यातलाच हा एक उपाय खूप प्रभावशाली आहे. हा उपाय आपल्याला दर मंगळवारी करायचा आहे. हा उपाय करत असताना आपल्याला जे पाणी आपल्या घराच्या दरवाज्यावर शिंपडायचे आहे. ते पाणी आपण सकाळी किंवा दुपारी शिंपडायचे आहे.

संध्याकाळच्या वेळी हे पाणी आपल्या घराच्या दारावर अजिबात शिंपडायचे नाही. याची काळजी घ्यायला हवी. आपण जे पाणी घराच्या दरवाज्यावर शिंपडणार आहोत ते पाणी तिन्ही सांजाच्या वेळी म्हणजेच पाच नंतर शिंपडायचे नाही हे पाणी कशा पद्धतीने शिंपडायचे आहे.

आता हा प्रश्न पडला असेल तर घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरील बाजूस उभे राहून आपल्या घराकडे बघत उभे राहायचे आहे. आणि घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे. हे पाणी शिंपडत असताना ज्या वाटीमध्ये आपण पाणी घेतलेले आहे.

त्या वाटेतील पाणी आपल्या उजव्या हातावर घ्यायचे आहे. आणि त्यातील पाणी आपल्या घराच्या उंबरठ्यावर दारावर व घराच्या सर्व परिसरात भोवती हे पाणी उजव्या हाताने शिंपडायचे आहे. आपल्या घराच्या पायऱ्या वगैरे म्हणजेच काय आपल्या घराच्या बाहेरील आवारात चारही बाजूने आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे.

यामुळे कोणतेही दोष आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत. आता जे पाणी आपण घराच्या मुख्य दरवाजावर व अवतीभवती शिंपडणार आहोत. ते पाणी कसे तयार करायचे आहे. तर एका वाटीमध्ये शुद्ध पाणी जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. ते पाणी घेतले तरी चालते.

एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये थोड्या कापराच्या वड्या त्या पाण्यामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजेच काय एक वाटीभर शुद्ध पाणी व दोन कापराच्या वड्या आपल्याला घ्यायचे आहेत. आणि थोडावेळ ते पाणी व कापराच्या वड्या तशाच ठेवून द्यायचे आहेत.

थोड्या वेळानंतर ते पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर व घराच्या अवतीभवती सर्वत्र शिंपडायचे आहे. आणि जे काही पाणी शिल्लक राहिलेले आहे. ते पाणी तुम्ही एका साईडला कोठेही बाजूला ठेवू शकता. व तो कापूर देखील त्याच ठिकाणी ठेवायचा आहे.

जेवढे पाणी आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत तेवढेच पाणी घेतले तरी चालते. आपल्याला हा उपाय दर मंगळवारी म्हणजेच आठवड्यातून एकदा करायचा आहे. मात्र हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारचा दिवसच निवडायचा आहे.

हा उपाय केल्याने आपल्या घरावर कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडणार नाही. त्याचबरोबर कोणतीही वाईट बाधा नजर दोष होणार नाही. नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही. घरामध्ये सर्वत्र सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे घरातील वातावर चांगले राहील. घरातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभेल. आणि घरावर व घरातील सदस्यांवर कोणतेही संकट येणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment