गणेश विसर्जनापूर्वी बाजुच्या भिंतीवर हे दोन टिळक लावा, अपार धन मिळेल..!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस, गणपती बाप्पाचे आपल्या घरात आगमन होते. यावर्षी 10 सप्टेंबर या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केले गेली.

या काळात गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर, आपण मनोभावे त्यांची पूजा करतो. मात्र 14 सप्टेंबर रोजी घरगुती गणेश विसर्जन असल्यामुळे, या दिवशी घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे, मात्र त्यापूर्वी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे.

त्यामुळे जर तुम्ही श्री गणेश विसर्जनपूर्वी हा एक चमत्कारिक उपाय केल्यास, श्री गणेश विसर्जनानंतर गणपती बाप्पा आपल्या घरातून निघून गेल्यावर, त्यांच्यासोबत आलेल्या रिद्धी-सिद्धी आपल्या घरात कायमस्वरूपी वास करतील. त्यामुळे आपल्याला अपार धन संपत्तीची प्राप्ती होईल.

या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख-समृद्धी येतेच, त्याशिवाय आपल्या परिवारात पैसा येण्याचे नवीन मार्ग निर्माण होण्यास मदत होते.तसेच हा उपाय करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील दुःख, दुर्भाग्य आणि दरिद्रता नष्ट होवून, आयुष्याला नवीन उभारी मिळते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी वरदविनायक गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरामध्ये विराजमान झाले आहेत. त्यामुळे आपण जी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन केलेली आहे, त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये किंवा कमरेवर जाणव्याच्या रूपात सर्प असला पाहिजे. कारण ज्या गणेश मूर्तीच्या गळ्यामध्ये किंवा कमरेवर जाणव्याच्या रूपात साप असतो, ते गणपती बाप्पा व्यक्तीच्या जीवनात सुख व संपदा निर्माण करीत असतात.

याशिवाय गणपती बाप्पांच्या खांद्यावरही जाणव्याच्या रूपात साप असावा किंवा पोटावर म्हणजेच कमरेवरती साप बांधलेला असावा, कारण अशा गणपतीच्या मूर्तीमुळे आपल्या घरात सुखसमृद्धी निर्माण होण्यास मदत होते. आपल्याला अपार धन संपदा हे गणपती बाप्पा मिळवून देतात.

ज्या वेळी आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये घेऊन येतो,तेव्हा दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन स्वस्तिक अवश्य काढलेल्या असले पाहिजेत. यामधील एक स्वास्तिक हळदीचे तर,दुसरे स्वास्तिक कुंकवाचे असावे. असे दरवाज्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून झाल्यानंतर, दरवाजाच्या दोन्ही तुपाचा दिवा रिद्धी-सिद्धी याच्यासाठी लावला पाहिजे.

मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे, श्री गणपती बाप्पांचा आपल्या घरामध्ये प्रवेश आपला उजवा पाय सर्वप्रथम घरांमध्ये टाकून केला पाहिजे आणि गणपती बाप्पाची स्थापना केली पाहिजे. यानंतर गणेश विसर्जनापूर्वी जिथे आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केली आहे, त्याच्या शेजारी असणाऱ्या भिंतीवर मग ती भिंत पाठीमागे किंवा उजव्या बाजूला अथवा डाव्या बाजूला असली तरी चालेल.

तर आपल्याला या भिंतीवर दोन टिळक करायचे आहेत. यातील एक टिळक हळदीने तर दुसरा टिळक कुंकवाने करायचा आहे. कारण हे दोन टिळक आपल्या घरातील रिद्धी आणि सिद्धी यांच्या निवासाचे प्रतिक मानले जाते. जेव्हा आपण गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करतो, त्यावेळी गणपती बाप्पा गेल्यावर, रिद्धी-सिद्धी धनाचा रूपांमध्ये आपल्या घरातच राहतात.

रिद्धी-सिद्धी या गणपती आपल्या घरामध्ये आलेले असतात. त्यामुळे जर का आपण हे टिळक लावले नाहीत, तर रिद्धी-सिद्धी या श्री गणपती बाप्पांच्या सोबत विसर्जनाच्यावेळी निघून जातात आणि हे दोन टिळक जर का लावले तर, आधी आपल्या घरांमध्येच राहतात व गणपती बाप्पांचे विसर्जन होऊन जाते.

या रिद्धी-सिद्धी आपल्याला अपार धन संपदा प्राप्त करून देतात. आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात करतात. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्रदान करतात आणि म्हणून आपण हे दोन टिळक गणेश विसर्जनापूर्वी बाजूच्या भिंतीवर अवश्य करावेत.

आपल्या जीवनातील सर्व विघ्न संपून जाऊ देत व आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य तसेच संपत्ती यांची भरभराट होऊ दे, हीच श्री गणपती बाप्पापुढे प्रार्थना..!!

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment