मित्रांनो काही लोकांना उगाचच असे वाटते की त्यांचं नशीब त्यांना साथच देत नाही, तर अशा लोकांसाठीच आपला आजचा हा उपाय आम्ही घेऊन आलो आहेत. अशा लोकांनी नक्कीच करुन पहावा असा हा उपाय आहे.
हा उपाय केल्याने चमत्कारीक पद्धतीने त्यांचे भाग्य त्यांना साथ देऊ लागेल, त्यांचे नशीबही उजळेल फारच कमी खर्चात भाग्योदय करणारा, आणि धन दौलतीची कमी भरुन काढणारा असा हा उपाय आहे.
बऱ्याचदा होते असे की आपण खूप मेहनत करतो मात्र आपल्याला त्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही. पैसा काही केल्या प्राप्त होत नाही. कायमस्वरूपी त्यांच्या घरा मध्ये दारिद्र्य आणि गरिबी राहते. त्यांना त्या गरिबीतून बाहेर यायचे असते ते लोक अत्यंत काबाड कष्ट करत असतात, श्रम करत असतात.
तर अशा काही लोकांच्या घरी पैसा येतो पण तो टिकत नाही. काही कारणास्तव माता लक्ष्मी त्यांच्या वर नाराज असते. तर हे दारिद्र्य दूर करणारा भाग्याचा उदय करणारा असा हा अचूक उपाय नक्की करावा असाच आहे.
हा उपाय करण्यासाठी आपण प्रथम आपण काही गहू दळून आणायचे आहेत. पण त्यासाठी शनीवारचा दिवस निवडायचा आहे. मित्रांनो,एक लक्षात ठेवा आपल्याला आठवड्या मध्ये जेवढे वार असतात त्यामधील फक्त शनिवारच्या दिवशीच आपण हे गहू दळून आणायचे आहेत.
हे गहू दळून आणल्या नंतर त्यामध्ये नंतर मूठ भर हरभऱ्याचे पीठ मिसळायचे आहे जे हरभरे आपण वापरतो त्याच हरभऱ्याचे पीठ (बेसन पीठ) त्या गव्हाच्या पिठामध्ये टाकायचे आहे.
हे एकत्र केलेले मिश्रण आपण त्या पिठाच्या चपात्या करण्यासाठी वापरायचे आहे. आपण त्या पिठाच्या चपात्या करून खायच्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला पहिल्या दिवसा पासूनच याचा फरक दिसायला सुरवात होईल.
तुम्हाला जाणवेल की तुमच्या भाग्याचा उदय होत आहे. ज्यांचे भाग्य साथ देत नव्हते त्यांना त्यांचं भाग्य साथ देऊ लागेल, नशीब साथ देऊ लागेल. त्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडणारा असा हा उपाय आहे. विनाखर्चिक आणि सोपा.
मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा पण हा उपाय करताना एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायला हवी की फक्त शनिवारच्याच दिवशी हे गहू दळून आणायचे आहेत आणि आणल्या बरोबरच त्या गव्हाच्या पिठात हरभऱ्याचे पीठ मिसळायचे आहे.
या उपायाने तुमचे नशीब नक्कीच बदलेल व तुमच्या आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा होईल, व धनाची देवता माता लक्ष्मींचे कायम स्वरूपी तुमच्या घरा मध्ये वास्तव्य राहील. त्यांचा वरद हस्त तुमच्यावर कायम बनून राहील.
मित्रांनो, हे जे हरभऱ्याचे पीठ आपण गव्हाच्या पिठात मिसळणार आहात त्या वेळी तुम्हाला माता लक्ष्मी चे नामस्मरण करायचे आहे माता लक्ष्मींचा “ओम श्री महालक्ष्मी नमो नमः” या मंत्राचा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे.
तसेच त्या पिठाच्या चपात्या करताना देखील माता लक्ष्मींचे नामस्मरण व वर दिलेल्या मंत्राचे उच्चारण करायचे आहे. त्याच बरोबर माता अन्नपूर्णेचे देखील नामस्मरण करायचे आहे आणि मग त्या चपात्या करायच्या आहेत.
आपण घरातल्या इतर व्यक्तींना सुद्धा त्याच चपात्या खायला द्यायच्या आहेत आणि घरातील सगळ्यांनी कुटुंबियांनी मिळून या चपात्या खाल्ल्यास या उपायाने घरात सुबत्ता तथा बरकत लाभेल.
मित्रांनो या उपायाने तुमच्या घरातील सगळे दारिद्र्य निघून जाईल व तुमचे नशीब चमकू लागेल आशा प्रकारे तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळायला सुरूवात होईल.
टिप – कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर कुणीही अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.