Monday, May 29, 2023
Homeआरोग्यघरात बसून आयुष्य कमी करुन घेऊ नका, तरुण राहण्यासाठी एवढं करा..!!

घरात बसून आयुष्य कमी करुन घेऊ नका, तरुण राहण्यासाठी एवढं करा..!!

आपले पाय मजबूत ठेवा, नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा..!!!
घरात बसुन आपले आयुष्य कमी करू नका खालील माहिती वाचा.

आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत. आपण जसे वृ’ध्दत्त्वाकडे झुकत असतो किंवा वृ’ध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नै’सर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.

प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.

दोन आठवडे तुमच्या पायांना हालचाल नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.

डेन्मार्क च्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.

एकदा आपल्या पायांचे स्नायू दु’बळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो. नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही. म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आपल्या संपूर्ण श’रीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.

आपल्या श’रीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.

गंमत म्हणजे श’रीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.

मनुष्याच्या श’रीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं ही सुध्दा पायांतच असतात.

मनुष्याच्या श’रीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.

मानवाच्या श’रीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील श’क्ती ख’र्च पडते ती दोन पायांमुळेच.

तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मां’ड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?

पाय हे श’रीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.

दोन्ही पायात मिळून श’रीरातील एकूण न’सांपैकी ५०% नसा, ५०% र’क्तवा’हिन्या असतात आणि त्यांतून ५०% र’क्त वाहात असतं.

अवघ्या श’रीराला जोडणारे ते एक र’क्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.

जेंव्हा पाय स’शक्त असतात तेंव्हाच र’क्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे हृ’दयसुध्दा निश्चितच बळकट असते.

वा’र्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.

जसजसे वा’र्धक्य वाढते तसतसे श’रीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. ता’रुण्यात तसे नसते.

तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे श’रीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते, त्यामुळे म्हा’ताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.

अ’स्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील र’क्तस्रावासारखे जीवघेणे आजार.

पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठी नंतर सुध्दा.

आपले पाय काळाबरोबर वृ’ध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.

केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृ’ध्दत्व थोपवू शकते.

रोज किमान ३०/४० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम मिळून पायांचे स्नायू स’शक्त राहतील.

आपल्या जवळच्या व’यस्क मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत ही माहिती अवश्य शेयर करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स