मित्रांनो, आपल्याला नेहमीच सुख समाधान ऐश्वर्य व आनंद मिळावं भरपूर धनसंपत्ती मिळावी असे सर्वांनाच वाटते. यासाठी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न सुद्धा करत असतात. पण नुसतेच प्रयत्न करून काहीही होत नाही किंवा नुसतीच ढोर मेहनत करून काहीही होत नसते. कारण अशाप्रकारे खूप कष्ट करून जर आपल्याला श्रीमंत होता आले असते. तर दगड फोडणारा मोलमजुरी करणारा व रोजंदारीवर काम करणारा कामगार वर्ग यापैकी कितीतरी लोकं आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये राहिले असते.
त्यासाठी आपण कष्ट तर नक्कीच करावे परंतु त्याबरोबरच आपल्या घरातही काही वास्तू दोष असू शकतात ते देखील आपण दूर करायला हवेत. म्हणूनच आज आपण आता पाहणार आहोत की आपल्या वास्तुमधील काही गोष्टी अशा आहेत.
ज्या आपण नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये बिघडलेले घड्याळ असेल तर ते आपण घरात अजिबात ठेवून घेऊ नये. तसे केल्यास ते अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या प्रगतीत अनेक अडथळे निर्माण होतात.
घरातील डस्टबीन मध्ये कचरा साठवून ठेऊ नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून डस्टबिन मधील कचरा वेळोवेळी साफ करावा. किंवा तो घराबाहेर फेकून द्यावा. आपण झोपतो त्या बेडरूम मध्ये कोणत्याही झाडाचे रोप लावू नये.
आपल्या घरातील टॉयलेट ची भिंत आणि देवघराची भिंत संलग्न नसावी. बेडरूम मध्ये धा’र्मिक पूजेच्या वस्तू अथवा देवी – देवतांचे फोटो अजिबातच ठेवू नयेत. सुकलेली फुले किंवा निर्माल्य घरातील कोणत्याच रूम मध्ये ठेवू नयेत. ते त्वरित विसर्जित करून यावे. देवांना वाहिलेली फुले सर्व निर्माल्य माळा वगैरे लगेच दुसऱ्या दिवशी काढून विसर्जन कराता येईल ते बघावे.
आपल्या घरातील रोज वापरात असलेला झाडू कुणालाही दिसणार नाही,अशा ठिकाणी ठेवावा. तसेच घरात निवडुंग किंवा बोन्साय केलेले क़णतेही वृक्ष शोभेसाठी ठेवू नयेत. शा’स्त्रानुसार निवडुंगा मुळे तुमच्या प्रगतीमध्ये अ’डथळे येतात तर बोन्साय मुळे तुमच्या प्रगती मध्ये बाधा तयार होते. जेवणानंतर स्वयंपाक घराच्या सिंकमध्ये खरकटी भांडी तशीच साचवून ठेवू नयेत. त्यामुळे घरात दारिद्र्य येण्याचे लक्षण असतात.
घराच्या ईशान्य दिशेला एखादे तुळशीचे रोप लावल्याने स’कारात्मक वातावरण घरात तयार होते. घराच्या हॉल मध्ये तसेच बैठकीच्या खोलीमध्ये बांबूचे रोप लावावे. हे विशेषतः पूर्व दिशेला लावलेले असेल तर खूप शुभ असते. रोज सकाळी उठताच सर्व खिडक्या पूर्ण उघडाव्यात. यामुळे रात्री निर्माण झालेली न’कारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते आणि सूर्यकिरणे आत येतात. तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा सहज खेळू लागते.
घरामध्ये प्रा’ण्यांच्या का’तड्यापासून निर्मित सजावटीच्या वस्तू अजिबात वापरू नयेत. ही गोष्ट अत्यंत अ’शुभ मानली जाते. घरामध्ये जर फुटलेला आरसा किंवा फ्रेम असेल तर ते अजिबात ठेवून घेऊ नये. यामुळे घरात न’कारात्मक ऊर्जा पसरते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक किंवा ओम लावल्याने घरात सुख शांती समाधान कायम राहते.
म्हणून प्रवेश द्वारावर स्वस्तिक ओम किंवा आपले कोणतेही धा’र्मिक चिन्ह जरूर लावावे. मंदिराची सावली घरावर पडणे अ’शुभ असते. त्यामुळे घरात आजारपण येण्याची शक्यता असते. म्हणून मंदिराची किंवा मंदिराच्या झेंड्याची सावली आपल्या घरावर पडणार नाही अशा ठिकाणी आपले घर असावे. घराच्या दक्षिण भागात लाल रंगाचे एखादे पेंटिंग लावावे.
असे केल्याने घरातील प्रमुख व्यक्तीचा आत्मविश्वास देखील वाढतो. घराच्या पूर्व भिंतीला लाकडी फ्रेम मधील चित्र लावावे. कारण ही दिशा का’ष्ट या त’त्त्वाची मानली जाते. सकाळी सकाळी आवडत्या देवतांच्या मंत्रांचा एखादा ऑडीओ लावावा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व अल्हाददायक तसेच सकारात्मक होण्यास मदत होते.
घरात कधीही रद्दी मोडक्या वस्तू किंवा भंगार साठवून ठेवू नये. ते घरातल्या लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करते. या सर्व वास्तू टिप्स अगदी खात्रीशीर आहेत.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं’ध श्र’द्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश मुळीच नाहीये. येथे केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा व उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्र’द्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त सामान्य माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अं’ध श्र’द्धा म्हणून कदापि करू नका.
तुम्हाला अजून कोणते विषय वाचायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज सुद्धा नक्की लाईक करायला विसरु नका ज्यामुळे तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेतच मिळतील. आमचे फेसबुक पेज शेअर ही नक्की करा धन्यवाद.