Tuesday, March 19, 2024
Homeअध्यात्मगुरुवार विशेष स्वामींची सेवा.. स्वामी महाराजांचे व्रत किती गुरूवार करावे.?

गुरुवार विशेष स्वामींची सेवा.. स्वामी महाराजांचे व्रत किती गुरूवार करावे.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्र- मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना तर माहीतच आहे गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थ महाराजांच्या आजचा आवडीचा दिवस आहे. या दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा, विशेष आरती, विशेष नेवेद्य, देखील केला जातो. या दिवशी आपण स्वामींची बरीच सेवा करतो. व स्वामींना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारचे व्रत देखील केले जाते.

जसे की इतर देवी-देवतांचे व्रत असते. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची देखील व्रत आहे. हे व्रत अत्यंत साधे व सोपे आहे. फक्त हे व्रत करण्यासाठी पोथी असणे गरजेचे गरजेचे नाही. हे गुरुवारचे व्रत करत असताना 9 गुरुवार या पद्धतीने हे व्रत करायचे असते. म्हणजे नऊ गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे आहे. सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची धूप दीप लावून पूजा करायचे आहे.

1 माळी किंवा अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे त्यानंतरच आपले गुरुवारचे व्रत सुरू होणार आहे. आणि मित्रांनो गुरूवारच्या दिवशी आपल्याला फक्त फळे खाऊन किंवा बीन मीठाचे पदार्थ आपल्याला खायचे आहेत. व संध्याकाळी धूप दीप लावून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला नमस्कार करावा. व आपण घरा मध्ये बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा.

आणि त्यामध्ये गोडाधोडाचा त्याचबरोबर चपाती भाजी जे काही आपल्या घरामध्ये तयार होते, त्याचा नैवेद्द स्वामींना दाखवावा. आणि मित्रांनो जो नेवेद्य आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवला आहे तोच निवेदन आपण उपवास सोडण्यासाठी घ्यावा. हे किती गुरुवारचे उपकृत करावे. असा प्रश्न आपल्याला पडतो त्या मध्ये आपण पाच गुरुवार 9 किंवा 11 अशा विषम संख्या मध्ये हे व्रत आपण करू शकतो.

आणि मित्रांनो हे उपवास करत असताना आपल्याला काही अडचणी आल्यास सुतक आले तर त्यादिवशी उपवास धरावा. मात्र त्याची मात्र तो गुरुवार आपण संकल्प केलेल्या गुरुवार यामध्ये धरु नये. त्याच्या पुढचा येणारा गुरुवार तो आपण संकल्प केलेल्या गुरुवारामध्ये धरावा. जा गुरुवारी आपल्याला काही अडचणी आल्या असतील त्या गुरुवारी फक्त उपवास करावा. स्वामी समर्थ महाराजांची पूजा करू नये हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

आपण जे स्वामी समर्थ महाराजांकडे मागून ते आपल्याला प्राप्त होईल आणि मित्रांनो फक्त आपल्या परीने होता होईल तेवढे स्वामींचे नामस्मरण व त्यांची सेवा करावी. व त्यादिवशी स्वामी चरित्र सारामृत वाचावे व स्वामी समर्थ या नामाचा सदैव जप करावा. मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचे अशा पद्धतीने व्रत नक्की करा. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्याला जे हवे आहे, ते मिळेल त्यावेळी स्वामींचे हे व्रत जरूर करावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स