गुरुवारच्या दिवशी पाकिटात ठेवा या झाडाचे मूळ, होईल चमत्कार, धनाची होईल बरसात..!!
आपले पॉकेट तसेच पर्स कधीही रिकामं राहणार नाही.
नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, माणूस आयुष्यभर पैसे कमवण्यात मग्न असतो. पण आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा त्याला आर्थिक संकटातून जावे लागते.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने व्यक्ती भौतिक सुखांपासून वंचित राहते तसेच मानसिक तणावाचा बळी ठरते. असेही काही लोक आहेत ज्यांचे उत्पन्न खूप चांगले आहे परंतु त्यांचा अचानक खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त होऊ लागतो. अशा व्यक्ती संपत्ती जमा करण्यास सक्षम नसतात. ते जे कमावतात त्यापेक्षा जास्त खर्च होत असतो.
जीवनातील ग्रहांचा विपरीत परिणाम तुमच्या संपत्ती संचयात अडथळा बनू शकतो आणि तुमच्या आर्थिक समस्यांना जन्म देऊ शकतो. कधीकधी आपण केलेले छोटे छोटे उपाय आपल्या सर्वात मोठ्या समस्या एका क्षणात सोडवतात. म्हणून, आज तुम्हाला अत्यंत लाभदायी ठरेलअसा साधा सोपा उपायआज् आम्ही सांगणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या उपायाबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा उपयोग तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी केला जाऊ शकतो.
चला तर मग जाणून घेऊ केळीच्या झाडाच्या मुळाचा हा छोटासा उपाय ज्यामुळे लक्ष्मी माता कधीही तुमच्यावर रुसणार नाही –
गुरुवारी अंगावर पिवळे कपडे घालावे. जर तुम्ही पूर्णपणे पिवळे कपडे घालू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या डोक्यावर, तुमच्या गळ्याभोवती किंवा तुमच्या हातावरही अंशतः पिवळे कापड बांधू शकता. तुम्ही घरी एका केळीच्या झाडाची छोटीशी मुळी घेऊन यावी.
केळीच्या मुळाचा लहान भाग घ्यावा जो तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये सहज ठेवू शकता. आता या केळीचे मूळ शुद्ध पाण्याने धुवा, त्यानंतर ते कच्च्या दुधाने आणि गंगाजलाने धुवा.
आता या केळीचे मुळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून तुमच्या पर्समध्ये ठेवा. हे केळीचे मूळ नेहमी आपल्या पर्समध्ये ठेवा आणि प्रत्येक गुरुवारी पिवळे कपडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घालण्याचा प्रयत्न करा.
हा उपाय केल्यास काही दिवसातच परिणाम तुमच्या समोर दिसू लागतील. तुमचे अनावश्यक खर्च कमी होऊ लागतील. तुमची पर्स नेहमी पैशांनी भरलेली असेल. पैसे वाचवणे सोपे होईल. पैसे कमावण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. पैशाशी संबंधित छोट्या मोठया सर्व समस्यांमध्ये हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.
केळीच्या झाडात साक्षात् विष्णु भगवान वास करतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत तर राहतीलच पण माता लक्ष्मी आपण होऊनच तुमच्या जवळ येईल. अशाप्रकारे माता लक्ष्मीची आणि श्रीविष्णूंची आपल्यावर कृपादृष्टी कायम राहील. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
“सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरि, नारायणी नमोस्तुते.”
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!