मित्रांनो आचार्य चाणक्य हे महान ज्ञानी होते. त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्ता व ज्ञानाच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्य यांना राजा बनवले होते. चाणक्य नीति हे आपल्या सामान्य लोकांसाठी खूपच फायदेशीर आहे.
त्यांनी आपल्या नीतीमध्ये लोकांना आचरण करण्यासाठी खूप महत्त्वाचा उपदेश केलेला आहे.त्यांच्या या नीतीचे आपल्या जीवनामध्ये केले तर आपल्याला या जीवनात कोणत्याही गोष्टी कठीण वाटणार नाहीत.
आज आपण चाणक्यांनी सांगितलेले व्यक्ती नरकात कशा जातात, त्याची काय कारणे आहेत ते पाहणार आहोत.
सगळ्यात पहिले लक्षण आहे क्रोधी स्वभाव. ज्या व्यक्तीचा स्वभाव क्रोधी असतो. जे तापट स्वभावाचे असतात. ज्यांना प्रत्येक लहानसहान गोष्टीवर राग येतो. अशा व्यक्तींना नरकात जावे लागते. कारण अशी व्यक्ती रागाच्या भरात खूप चुकीचे निर्णय घेतात. व चुकीची कामे करतात. म्हणून क्रोध करणारी व्यक्ती नरकात जातात.
दुसरे लक्षण म्हणजे दुसऱ्यांशी कडू बोलणे. काही व्यक्तींना इतरांची वाईट बोलण्याची सवय असते. नेहमी इतरांना टोमणे मारून, टोचून बोलण्याची सवय असते. त्यांच्या अशा वाईट आणि कडू बोलल्यामुळे इतरांना दुःख होते, त्यांना त्रास होतो. त्यामुळे असे कडू बोलणारे व्यक्ती नेहमी नरकातच जातात.
काही व्यक्ती समोर चांगले राहतात व पाठीमागे निंदा करतात. आपल्या प्रियजनांशी इर्षा करतात. त्यांच्याबद्दल मनात विष भाव ठेवतात. त्यांच्याबद्दल मनात शत्रुत्व ठेवतात.
आणि मनातल्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी द्वेष व चीड ठेवतात. आचार्य चाणक्य यांच्या मते हे व्यक्ती नरकात जातात. हे लक्षण नरकात जाण्याचे आहे.
चौथे लक्षण म्हणजे नीच किंवा दृष्ट व्यक्तींची संगत. जे लोक नीच व दृष्ट व्यक्तींच्या संगतीत राहतात, त्यांच्यासोबत आपला वेळ घालवतात. तसेच नीच लोकांची सेवा करतात.
त्यांच्या पुढे पुढे करतात. दृष्ट व्यक्तींची हाजी हाजी करतात. असे व्यक्ती ही चाणक्यांच्या मते नरकाचे भागी बनतात. मित्रानो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की नरकात जाणाऱ्यांचे काय लक्षण आहेत ते.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाइक करा व शेयर करायला विसरु नका.