लग्न झाल्यानंतर ही १ वस्तू कधीच मुलीने सासरी घेऊन जाऊ नये : नाहीतर घोर अनर्थ घडू शकतो.!!

मित्रांनो असे म्हणतात मुलगी झाली लक्ष्मी आली. मुलीला आपण देवी लक्ष्मी चे स्वरूप मानतो. मुली मध्येच देवी लक्ष्मी, देवी दुर्गा, देवी सरस्वतीचे रूप बघायला मिळते. मुलगी प्रत्येक आई-वडिलांची खूप लाडकी असते.

तिला राजकन्ये सारखे वाढवले जाते. पण मनात ही भावना असते की मुलगी ही परक्याचे धन आहे. काही दिवस आपल्या कडे राहील व काही दिवसानंतर तिला आपल्या घरून जावे लागणार आहे. म्हणून मुलगी वयात आली की आई वडील आपल्या लाडक्या परीचा विवाह करून देतात.

व आपली जबाबदारी पूर्ण करतात. मुलीचे लग्न थाटात व्हावे हे प्रत्येक मुलीच्या आई वडिलांचे स्वप्न असते. मुलीसाठी योग्य वर शोधणे, तिला काय हवे काय नको ते बघणे. लग्नात कोणत्या गोष्टीची कमी पडू नये यासाठी आई-वडील झटत असतात.

त्याप्रमाणे पाहुणे, सगे संबंधी सगळ्यांचा मानपान हे सर्व बघता बघता मुलीच्या आईवडिलांची दमछाक होते. आईवडिलांसाठी मुलीचे लग्न म्हणजे फक्त जबाबदारीच नाही तर आपल्या मुली प्रती प्रेम भावना व्यक्त करण्याचा हा एक सोहळा असतो.

आजकालच्या विवाह पद्धती या अगोदर पेक्षा खूप वेगळ्या आहेत. आज काल बँड बाजा, डेकोरेशन, पंचपक्वान, लाइटिंग, वरात मोठमोठ्या वस्तू काय काय केले जाते. परंतु या विवाह सोहळ्यात जरी बदल झाला असेल तरी ही लग्नाबद्दलच्या भावना आज ही त्याच आहेत.

आज कालच्या लग्नात जरी रूढी परंपरा पाळल्या जात नसल्या परंतु आपल्या लग्नात ज्या काही अपेक्षा असतील त्या सर्व पूर्ण केल्या जातात. या सर्व अपेक्षा पैकी एक अपेक्षा म्हणजे मुलीला सुंदर सुंदर भेटवस्तू देणे.

आज-काल मुलीला सुंदर सुंदर भेटवस्तू दिल्या जातात. परंतु या सर्व भेट वस्तूंपैकी एक अशी भेटवस्तू असते ती विशेष करून मुलीला दिली जाते. बहुतेक आई-वडील आपल्या लाडक्या मुलगीला लग्नात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून आवर्जून देतात.

हिंदू धर्मात बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते. म्हणजेच जेथे बाप्पा असतात तिथे कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाहीत. तसेच बाप्पांना शुभतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच मुलीच्या आयुष्यात कोणतेही विघ्न येऊ नये व तिच्या आयुष्यात सर्व काही शुभ व मंगल घडावे यासाठी बाप्पांची मूर्ती किंवा फोटो तिच्या लग्नात आवर्जून अवश्य दिली जाते.

परंतु तुम्ही सुद्धा मुलीच्या लग्नात बाप्पांची मूर्ती किंवा फोटो देण्याचा विचार करत असाल तर हा विचार लगेचच बदला. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे का. शास्त्रानुसार मुली या देवी लक्ष्मी चे स्वरूप मानले जातात.

देवी लक्ष्मी व गणपती बाप्पा एकत्र असणे म्हणजे धनाचा हा संकेत आहे. अशात आपण घरातील लक्ष्मीला जाताना गणपती बाप्पा जर दिले तर तिच्या मागे घरात खूप मोठी धनहानी होऊ शकते. ती जाताना घरातून सर्व सुख-समृद्धी घेऊन जाते.

म्हणून मुलीला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो लग्नात भेट म्हणून देऊ नये. जर आपल्या मुलीचा विवाह यापूर्वीच झालेला आहे. व आपण तिला बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून दिले असेल आणि आपल्याला त्याचे परिणाम भोगावी लागत असतील.

तर आता काय करावे म्हणजे स्थिती पूर्ववत होईल. यासाठी आपल्या मुलीला सांगावे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला भेट म्हणून द्यावी. हे खूप शुभ असते, कारण घरातील मुलीने जर घरासाठी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून दिली तर त्यामुळे घरात बरखत राहील.

तसेच देवी लक्ष्मी कायमची आपल्या घरात वास्तव्य करेल. मित्रांनो आता आपल्याला लक्षात आलेच असेल की मुलीला लग्नात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो का देऊ नये ते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment