Saturday, June 10, 2023
Homeरिलेशनशिपमामा किंवा आत्याच्या मुलीबरोबर लग्न का करू नये.?

मामा किंवा आत्याच्या मुलीबरोबर लग्न का करू नये.?

मित्रांनो.. “मामाची मुलगी मुलगी म्हटली तर अगदी हक्काची समजली जाणारी मालकी असणारी बायको”. नाही का.?

सामान्यतः आपल्याकडे पहिलं गेलं तर महाराष्ट्रात वरील समज फार पूर्वीपासून प्रचलित आहे. लग्नाला अनुरूप कोणी भेटली नाही की लगेच मामाची मुलगी करून घ्यायची. काही घरी तर लग्नासाठी दुसरीकडे मुलीचा शोध ही घेतलाच जात नाही. त्यातल्या त्यात भावाला मुलगी झाली असली तर कित्येक घरी लहानपणीच संबंध पक्के करून घेतले जातात.

वचन जन्माचा वेळेसच घेतले जात की तुझी मुलगी माझाच घरची सून बनेल. आणि जर असा नाहीच झाला तर मग सख्या भावा – बहिनीच्या नातेसंबंधात कटुता येते. मी माझा कॉलेज लाईफ मध्ये पण माझा बऱ्याच मित्रांना पाहीला आहे. त्यांची हक्काची प्रेयसी म्हणजे त्यांची मामची मुलगी. आणि त्यावरून कित्येक जणांना चिडवला ही जायचं.

खरं तसा बघायला गेलं तर हा फार चुकीचा समज आपल्या समाजात रोवलेला आहे. बघा या ठिकाणी मी आपल्याला धर्म किंवा त्या गोष्टींच्या अनुषंगाने काहीच नाही सांगणार आहे. असेल ते फक्त वैज्ञानिदृष्ट्या स्पष्टीकरण.

आपण अगोदर हे बघुयात की नात्याताच लग्न का केले जाते. याच सगळ्यात मोठा कारण म्हणजे घरातली संपत्ती घरातच राहावी आणि नातेसंबंध अधिक बळकट व्हावे.

जेव्हा स्त्री आणि पुरुष संबंध होतो तेव्हा निसर्ग नियमानुसार अपत्यप्राप्ती होते. परंतु येणारे अपत्य हे स्वास्थवर्धक असेल की नाही हे सर्वस्वी समागम करणाऱ्या स्त्री आणि पुरुषाच्या जनुकांवर अवलंबुन असते. जर आपण सख्या बहीण आणि भावाचा विचार केला तर त्यांच्यात जनुके जवळपास 50% सारखे असतात.

जेव्हा समान जनुके असलेल्या स्त्री पुरुषाचा संबंध होतो तेव्हा त्यांच्यापासून होणाऱ्या अपत्यामध्ये बऱ्याच विकृती उद्भवतात जसे की जन्मतःच बालक विकलांग असणे, त्याची वाढ पुरेशी नसणे, बालक जन्मापासूनच मतिमंद असणे किंवा गतिमंद असणे. त्यामुळेच सख्खा बहीण आणि भवामध्ये कधीच लग्न नाही केला जात.

त्याउलट मामाच्या आणि आत्याचा मुलांमधे इतकी समानता नसते म्हणूनच त्यांचा लग्न केला जाता. परंतु याकडे साफ दुर्लक्ष केलं जात की शेवटी तेही एकाच कुटुंबात असल्यामुळे काही प्रमाणात का असेना त्यांचाही जनुकांमध्ये समानता असतेच. आणि त्याचा त्रास त्या पिढीला जरी नसला तरी येणाऱ्या पिढीला होतोच.त्यामुळेच आपल्याकडे गोत्र बघण्याची एक पद्धत आहे. त्यामागे हाच हेतू असतो की गोत्र समान असेल म्हणजे कुठे तरी नातं हे असतंच म्हणून समान गोत्र असेल तर लग्न होत नाही.

आमच्याकडे अजून एक पद्धत आहे ती म्हणजे मुलीच्या आणि मुलाच्या आडनाव/कुळ सारखा नसावा. तर त्यामागेही हेच कारण आहे.

यामुळेच नात्यात लग्न न केलेले केव्हाही चांगलेच.!!

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स