नशिबाची साथ हवी असेल तर, या चूका करु नका..!!! वास्तूदोष निवारण..


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरात कुटुंबात अशा काही गोष्टी असतात की त्यामुळे आपले बरेचसे नुकसान होत असते त्यामुळे आपल्याला अनेक फटके बसत असतात आणि घरी लक्ष्मी टिकत नसते. घरातील सुख शांती टिकत नाही. मित्रांनी आपले घर वास्तुशास्त्रा प्रमाणे असावं.

मित्रांनो घराची सर्वात चांगली दिशा उत्तर आणि ईशान्य मानली जाते तसेच पुर्व, पश्चिम आणि वायव्य दिशा मध्यम मानतात व आग्नेय, दक्षिण, नैऋत्य दिशा खराब मानल्या जातात. हे आपल्याला माहिती आहेच.

आता तुम्हीच ठरवा की तुमच घर कोणत्या दिशेला असायला हवं, ईशान्य दिशेला आकाश काही जास्तच मोकळं असत कारण की पृथ्वी त्याच दिशेला आपल्या अक्षात झुकलेली आहे.हेच कारण आहे या दिशेला ईश्वर दिशा म्हणातात. त्याच बरोबर मित्रांनो आपल्या घरात कोण कोणत्या वस्तु असाव्यात आणि कोण कोणत्या नसाव्यात याला पण खूप महत्व आहे.

मित्रांनो आपल्याला घरातील पितळ, सोने,तांबे हे चांगले मानले जातात तर कांस्य, चांदी आणि जस्त याला मध्यम मानतात व लोखंड, स्टील, जर्मन याला निम्न मानले जातात. मित्रांनो आपल्या घरातील किचन मध्ये जास्त तर पितळ, तांबे, कांस्य, चांदी आणि लाकडाच्या वस्तु असायला हव्यात. लोखंडाच्या कपाट ऐवजी लाकडी कपाट ठेवलेले सर्वात चांगले. तिजोरी लोखंडाची ठेवू शकता. घरात प्लास्टिकच्या वस्तु आजिबात असू नयेत. पाहुयात अशाच काही चांगल्या व खराब वस्तू बाबत.

आपल्या घरात या तुटलेल्या वस्तु असू नयेत.
आपल्या घरामध्ये तुटलेल्या वस्तु असू नये जस की फुटलेले ग्लास, भांडी, फोटो, फर्नीचर, पलंग, घड्याळ, कप, फुटलेले देवांचे फोटो असे समान घरात असल्यामूळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. या वस्तु जरी फुटल्यातर त्यांना तात्काळ बाहेर नेहून टाकावेत. यामुळे माणुस मानसिक त्रासाला समोरा जातो. त्याचा अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतो.

खराब फोटो –
घरात जुने खराब फोटो असल्याने ही खूप त्रास होतो. तसेच ताजमहाल, झरणे, युध्द, हिंसक प्राणी, काटेदार झाडे, वाळवंट इत्यादी प्रकारचे फोटो घरात असल्याने घरात उदासपणा, निराशा आणि अशांती येते. त्यामुळे घरातील कोणतेही माणूस शांत राहत नाही त्यामुळे घरातील फुटलेले फोटो टाकून दिलेले केव्हाही चांगले.

फाटके जुने कपडे –
आपल्या असे खुप लोक असतात जे घरात कपाटात जुने कपडे फाटके कपडे तसेच चादर ठेवतात त्याने देखील घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि मित्रांनो नकारात्मक ऊर्जा ही नेहमी आपणासाठी वाईटच असते.

घरात न उपयोग होणार्‍या वस्तु कबाड –
मित्रांनो अनेकदा घरात कबाड साठवून ठेवतात जस की लोखंड, प्लास्टीक, काच अश्या वस्तु जास्त असतात आणि हे घरामद्धे असणे योग्य नाही त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि घरातील सुख शांती दूर होते. अनेक स्त्रिया तसेच मानसे असे कुठे काही मिळेल ते आणून घरात साठवत असतात पण ते अतिशय चुकीचे आहे.

जुनी किंवा फाटलेली व तुटलेली चप्पल –
मित्रांनो आपल्या घरातील जुनी व तुटलेली चप्पल घरात असल्याने देखील तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यावर अडचणी येतात. म्हणून त्याना पहिल्यांदा बाहेर फेकून द्या. असे चप्पल बूट घरात ठेवू नका.

जुन्या पर्स किवा तिजोरी –
मित्रांनो फाटलेली तुटलेली पर्स किवा तिजोरी असेल तर लक्ष्मी तुमच्या कडे कशी येईल पर्स मध्ये चावी किवा इतर कोणतीही अशुभ वस्तु ठेवू नका. महिलांच्या पर्स आणि तिजोरी मध्ये नेहमी पवित्र वस्तु ठेवा ज्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.ज्याना बघुन तुमचे मन प्रसन्न होईल. वातावरण तरुण प्रसन्न होईल.

जुनी तुटलेलं, सतत उघडं असणारं कपाट –
पुस्तकं किवा काही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी जी कपाट असतात त्याना दरवाजे नसतात अशी कपाटे उघडी मानली जातात. तसे कपाट असल्याने वेग वेगळ्या प्रकारच्या अनेक कामात अडचणी येतात आणि पैसा पण पाण्यासारखा वाहुन जातो.आपल्याला कळतही नाही की आपले नुकसान कशामुळे होत आहे.

अंगठीतले खडे –
मित्रांनो हा ही मुद्दा तसा खूप महत्त्वाचा आहे. कारण या अशा अंगठीतल्या खड्यांनी काय होते असे समजून आपण त्याचा साठा करत असतो. तसेच काही लोक घरामध्ये अनावश्यक खडे ठेवतात त्याच सोबत देवाचे दोरे ताविज अंगठ्या इत्यादी समान घरातच ठेवतात त्याना माहित नसत की कोणता खडा फायदेशीर आहे.

आणि कोणता नुकसान कारक त्यामुळे अश्या प्रकारच्या वस्तु घरात ठेवू नका एक छोटासा खडा ही तुमच भाग्य दुर्भाग्य कडे घेऊन जाऊ शकतो. तसेच जर तुम्ही अश्या काही अनावश्यक खडे घरात ठेवाल तर त्यातून येणारी ऊर्जा तुमच्या घरातील वातवरण बदलू शकतील.

मित्रांनो ह्या साध्या गोष्टी आहेत पण या कारणाने आपल्या घराची प्रगती खूप मोठी होईल इकडे लक्ष दिल्याने आपणाला रोज थोडी थोडी प्रगती होताना ना आपल्याला दिसून येईल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!