Saturday, June 10, 2023
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषपत्नीच्या पायगुणांमुळे उघडतात पतीच्या बंद नशिबाची द्वारे..!! जाणून घ्या कशी असावी आपली...

पत्नीच्या पायगुणांमुळे उघडतात पतीच्या बंद नशिबाची द्वारे..!! जाणून घ्या कशी असावी आपली धर्मपत्नी..??

नमस्कार मित्रांनो..
तुमच्यापैकी बर्‍याच लोकांनी हे ऐकलं असेलच की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या भारतीय धर्मग्रंथानुसार स्त्रियांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. परंतु बहुतांश वेळा काही लोक या कोंडीतून बाहेरच पडू शकत नाहीत.

की कोणती स्त्री त्यांच्यासाठी चांगली आणि योग्य आहे. मित्रांनो, जर आपण सुद्धा या समस्येने ग्रस्त असाल तर, कोणत्या प्रकारची स्त्री तुमच्या आयुष्यात नशिब घेऊन येऊ शकते हे आपण कसे ओळखावे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत‌

मित्रांनो, समुद्र शास्त्रानुसार असे म्हणतात की एखादी स्त्री जेव्हा लग्न करुन आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा ती आपल्यासोबत आनंद आणि सौभाग्य देखील घेऊ येते.

पण या समुद्रशास्त्रानुसार अधिक भाग्यवान महिलांचे काही वेगळे गुणधर्म आहेत. आता उशीर न करता हे जाणून घेऊया की एखाद्या स्त्रीच्या श-रीराचा बांधा किंवा एखादी खुण त्या स्त्रीला नशिबवान, आणि सौभाग्यशाली कशी बनवते.

असे म्हणतात की स्त्रियांचा सुंदर चेहरा जितका पुरुषांना आवडतो तितक्याच प्रमाणात त्यांना त्यांचे पाय देखील आवडतात. हेच कारण आहे की पुरुष चालतंना स्त्रियांच्या पायाकडे अधिक लक्ष देत असतात.

परंतु तुम्हाला हे माती नाही की महिलांचे पाय केवळ सौंदर्याच्या दृष्टीकोनातूनच सुंदर दिसत नसतात. तर त्यांचे पाय त्यांच्या स्वभाव गुणधर्मांबद्दल बरेच काही सांगतात. समुद्र शास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या पायाच्या तळव्यावर चक्र, ध्वज आणि स्वस्तिक यांसारखी दिसणारी खूण असते, त्यांच्या जीवन साथीला आयुष्यात सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळतात.

इतकेच नव्हे तर असेही म्हटले जाते की असे पाय आणि तळव्यावरील चिन्हं असलेल्या स्त्रियांचे यजमान आपले संपूर्ण आयुष्य एका राजासारखे जगतात, आणि एका राणीप्रमाणे आपल्या पत्नीला मान देतात.

ज्या स्त्रियांच्या पायांचे तळवे मऊशार असतील आणि त्यावरील भाग्यरेषा बोटांच्या दिशेने जात असतील तर अशा स्त्रिया पूर्णपणे आपल्या पतीच्या प्रति एकनिष्ठ असतात. त्यांचे आगमन तिच्या यजमानांच्या आयुष्यात आनंद आणते आणि यजमानांना प्रत्येक कामात यश मिळत जाते.

जर एखाद्या महिलेच्या पायाच्या तळव्यावर कमळ किंवा छत्रीचे चिन्ह असेल तर या महिलेचे यजमान राजकारणाच्या क्षेत्रात यशस्वी होतील आणि त्यांना समाजात मानही मिळेल.

समुद्रशास्त्रात असेही सांगितले गेले आहे की ज्या स्त्रियांचे पायांच्या मध्यमा आणि अनमिका या बोटांची लांबी एकसारखी नसते अशा स्त्रिया अतिशय शुभ असतात. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या यजमानांना त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही.

ज्या स्त्रियांच्या पायाच्या करंगळीच्या शेजारच्या बोटाची लांबी अंगठ्याच्या शेजारच्या बोटापे पेक्षा लहान असते, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात व्यतित होत असते.

या महिलांच्या यजमानांना कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. बहुतांश वेळा असेही दिसून येते की काही स्त्रियांची करंगळी चालत असतांना जमिनीला स्पर्श करत असते. समुद्र शास्त्रानुसार या स्त्रिया देखील खूपच भाग्यवान, आणि नशिबवान असतात.

टिप – वरील लेख केवळ धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स