नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आता सध्या महादेवांचा श्रावणमास चालु आहे, आणि हा महिना इतर सर्व महिन्यामध्ये महादेवांचा आवडता महिना मानला जातो. महादेवांना खुश करण्यासाठी त्यांच्या भक्तांद्वरे या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे उपाय तथा विधी केले जातात.
विविध भोग आणि वस्तू अर्पण करून महादेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच महादेवांना पाणी, दूध, बेलाचं पान, धोत्र्याची फुलं इ. वस्तू या महिन्यात मनोभावे अर्पण केल्या जातात. जेणेकरून महादेव आपल्यावर प्रसन्न होतील.
जसे की अपणा सर्वांना माहिती आहे महादेव हे भोळे शंकर आहेत भक्तांच्या हाकेला ते नेहमीच धावून येतात. आणि महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात व त्यांच्या कृपेचा वर्षाव करतात त्यातल्या त्यात श्रावण महिन्यात महादेवांची पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात.
मित्रांनो, ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळेला जे समुद्र मंथनातील हलाहल विष बाहेर पडले ते विष स्वतः महादेवांनी प्राशन केले होते आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता त्यामुळे महादेवांना नीलकंठ असेही म्हटले जाते. म्हणूनच महादेवांना श्रावण महिन्यात पाण्याचा व दुधाचा अभिषेकही केला जातो.
श्रावण महिन्यात महादेवांना अशाप्रकारे अभिषेक केल्यास आपल्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्तता होत असते. असे म्हणतात महादेवांना केवळ पाणी अर्पण केल्यामुळे देखील ते प्रसन्न होतात म्हणूनच महादेवांना जर आपण रोज शुद्ध जलअर्पण केल्यास आपली सर्व संकटे दूर होतात.
लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तीला व मनासारखा जोडीदार हवा असलेल्या लोकांनी जर महादेवांना उसाच्या रसाचा अभिषेक केला तर महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर लवकरच होत असते. तसेच महादेवांना तुपाचा अभिषेक केल्यास आपलं जीवन देखील निरोगी बनत असते व आपल्या आयुष्यातही वाढ होत असते.
मित्रांनो, चला तर आता जाणून घेऊयात घरात सुख समृद्धी येण्यासाठी काय खास उपाय करायचे आहेत –
मित्रांनो, श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी हातात काळे तीळ घेऊन आपण घराच्या मुख्य दरवाजात उभे राहून आपल्या डोक्यावरून ते तीन वेळा उतरवून घ्यायचे आहे व ते तीळ दाराच्या बाहेर टाकून द्यायचे आहे. असे केल्याने आपल्या घरातील ज्या पण काही वाईट शक्ती असतील त्या घराबाहेर निघून जाण्यास मदत होते व घरात कायम सकारात्मकता नांदते.
तसेच या श्रावण महिन्यात आपल्या घराच्या मुख्य दरवाजा बाहेर रोज एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकाव्यात असे केल्यामुळे आपल्या घरात सुख समृध्दी तथा भरभराटी येत असते व नकारात्मक शक्ती घरात कधीही प्रवेश करत नाही.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!