नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो स्वामीं समर्थांना या पाच गोष्टी मनापासुन आवडतात. आणि जो भक्त या पाच गोष्टी पाळतो, आचरणात आणतो. तर स्वामी त्याला लवकर भेट देतात. आणि त्याचे सगळे संकट हरतात. त्याच्या सगळ्याच्या इच्छा पूर्ण करतात.
तर या गोष्टी तुम्ही ही आचरणात आणा. स्वामींशी भेट होईल. लवकरात लवकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर त्या पाच गोष्टी या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना.
मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे. ही एक गोष्ट स्वामींना प्रिय आहे. अशा सगुण उपासनेला या सीमेला स्वामी प्रसन्न होऊन भक्ताची सर्व इच्छा पूर्ण करतात.
तर मित्रांनो तुम्ही स्वामींची मनापासून उपासना करा. त्यांची मनापासून पूजा करा. स्वामी नक्की तुम्हाला भेट देतील. मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान करणे म्हणजे सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.
लोक अन्नदान करतात. परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात. की त्यांचे त्यांना फळ मिळावे. पण हे अत्यंत चुकीचे आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे.
निदान एक चपाती किंवा एक भाकरी आपण एका गरिबाला देऊ शकतो. मागणारा कोणी गरीब आला तर त्याला नक्कीच अन्नदान करा. ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे.
मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण. सगळ्यांना माहीत आहे की !श्री स्वामी समर्थ! या नामात या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे. या नामाचे मनोभावे स्मरण केले.
तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्ताचे सर्व संकट हरतात. आणी सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच जनप्रियता. प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे, मोठ्यांचा आदर करणे.
सगळ्यांना प्रेम करणे, कोणाचाही तिरस्कार न करणे. जो व्यक्ती या गोष्टी पाळतो स्वामी त्याच्यावर नक्कीच प्रसन्न होतात. मित्रांनो पाचवी गोष्ट आहे आपली जी परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे.
म्हणजे आपल्याला जे मिळाला आहे त्यात आनंदात राहायचे. जास्त मागायचं नाही, जे आहे त्यावर रडायचं नाही. जे दिले आहे ते देवाने दिले आहे. आणि त्यातच आपण आनंदात राहून आपले जीवन जगायचे. तर मित्रांनो या पाच गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या आचरणात आणायच्या.
या गोष्टी आचरणात आल्या की श्री स्वामी समर्थ प्रसन्न होतातच हे लक्षात ठेवा. आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. मग आपल्याला सर्व काही मिळते, हवे ते स्वामी आपल्याला देतात. तर मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत त्या स्वामींना प्रिय आहेत. तर या गोष्टी आपल्याला पाळायलाच हव्यात.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!