Thursday, June 8, 2023
Homeजरा हटकेतुमच्या या 5 सवयी घेऊन जातात.. तुम्हाला बरबादीच्या रस्त्यावर..!!

तुमच्या या 5 सवयी घेऊन जातात.. तुम्हाला बरबादीच्या रस्त्यावर..!!

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या काही गुण आणि अवगुण सुद्धा असतात. एखाद्या व्यक्तीच्या गुणांमुळे, त्या व्यक्तीला समाजात मान सन्मान प्राप्त होतो आणि एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे तो अपयशाकडे किंवा अधोगती कडे वळतो. मित्रांनो, असेही म्हटले जाते की एखाद्याने आपल्या मध्ये असलेल्या अवगुणांना ओळखले पाहिजे आणि त्यांतून मुक्त होण्यासाठी योग्य ते प्रयत्न देखील केले पाहिजेत.

महात्मा विदुर यांनी विदुर नितीतील एखाद्या व्यक्तीच्या अशा काही सवयींचा देखील उल्लेख केला आहे, ज्या सवयींमुळे ती व्यक्ती नाश होण्याच्या मार्गाकडे हळूहळू जात असते. विदुर जी यांच्या मते, या सवयीमुळे माणूस कधीही त्याच्या आयुष्यात आनंदी, किंवा सुखी होऊ शकत नाही.

श्लोक –
अतिमानो अतिवादश्च तथात्यागो नराधिप।
क्रोधश्चात्मविधित्सा च मित्रद्रोह श्च तानि षट्।।
एत एवासयस्तीक्ष्णा: कृन्तन्यायूंषि देहिनाम्।
एतानि मानवान् घ्नन्ति न मृत्युर्भद्रमस्तु ते।।

घमेंड – विदुर जी म्हणतात की जो माणूस स्वतःची स्तुती करतो तो अहंकारी असतो. तो स्वत: ला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतो. विदुर जी म्हणतात की हे लोक कधीच सुखी होऊ शकत नाहीत.

राग – महात्मा विदुराच्या मते, राग हा एखाद्या व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू असतो. रागाच्या भरात माणसाची विचार करण्याची व समजण्याची क्षमता संपते. अशा परिस्थितीत, बर्‍याच वेळा एखादी व्यक्ती असे काहीतरी करते ज्यामुळे त्याचे नुकसान होते. म्हणूनच राग नेहमी टाळावा.

अधिक बोलणे – विदुर नितीनुसार जास्त बोलणे टाळावे. बर्‍याच वेळा लोक समोरच्या व्यक्तीला काहीतरी बोलतात ज्यामुळे त्यांना त्रास होतो. जास्त बोलण्याच्या सवयी माणसाला नाशाच्या वाटेकडे नेतात.

त्यागाचा अभाव – महात्मा विदुरच्या मते, ज्या लोकांमध्ये त्याग आणि समर्पण करण्याची भावना नसते त्यांना समाजात आदर आणि सन्मान मिळत नाही. असे लोक आयुष्यभर दु: खी असतात.

मैत्रीमध्ये फसवणूक – विदुर जी म्हणतात की मित्रांना फसवणे हे मोठे पाप आहे. खरा मित्र संकटाच्या वेळी तुमचा तारणहार होऊ शकेल. अशा परिस्थितीत, मित्राची फसवणूक केल्याने आपण जास्त काळ सुखी होऊ शकत नाही.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स