Friday, December 8, 2023
Homeवास्तूशास्त्र आणि वास्तू दोषया 5 प्रकारच्या सावल्या जर घरावर पडत असतील तर : होईल आयुष्याची...

या 5 प्रकारच्या सावल्या जर घरावर पडत असतील तर : होईल आयुष्याची नासाडी : जाणून घ्या उपाय..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय सामंजस्य आणि समृद्ध जीवन जगणारे विज्ञान आहे जे आपल्या सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींना दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या वास्तुसाठी तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं.

कधी कधी भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरते. स्वयंपाक घरात तसेच बेडरूम मध्ये काही दोष असल्यास आरोग्यावर परिणाम होतो. आज जाणून घेऊया काही वास्तू टिप्स ज्यामुळे तुमच्या वास्तुतील असे दोष दूर होतील. वास्तुशास्त्राचे व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्व आहे.

आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्र खूप महत्वाची भूमिका बजावते. घर खरेदी करण्यापासून ते फर्निचर एका विशिष्ट पद्धतीने ठेवण्यापर्यंत वास्तुशास्त्र महत्वाची भूमिका बजावते. असे मानले जाते की जर घराची दिशा चुकीची झाली तर व्यक्तीच्या जीवनात प्रगती थांबते. वास्तू एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.

वास्तुशास्त्रात अनेक वेधांचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये स्तंभवेध, वृक्षवेध आणि छायावेध इत्यादींचा समावेश आहे. छायावेधानुसार जर तुमच्या घरावर इतर कोणत्याही घराची किंवा झाडाची किंवा उंच इमारतीची सावली पडत असेल तर ते वास्तुदोषाचे कारणही बनू शकते.

असे मानले जाते की यामुळे, कुटुंबातील सदस्यांना बहुतेकदा आरोग्याशी संबंधित त्रास होतात. सावलीमुळे माणसाला मेंदू, हृदय आणि शरीराशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. याशिवाय जीवनात यश मिळवण्यात अडथळे येतात.

तथापि, घर बांधण्यापूर्वी, त्यावर पडणारी सावली शुभ किंवा अशुभ असेल की नाही हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. सावलीमुळे होणारे नुकसान आणि नफा तेव्हाच ओळखता येतो जेव्हा घरावर पडणारी सावली काय आहे आणि ती कोणत्या वेळेत पडत आहे हे कळते.

सावली कोणतीही असू शकते. म्हणजेच मंदिरे, झाडे, इतर घरे, उंच इमारती, विद्युत खांब इत्यादींचा यात समावेश आहे. वास्तुशास्त्रानुसार जर कोणत्याही घरावर सुमारे 6 तास सावली असेल तर त्याला छायावेध म्हणतात. छायावेधांचे किती प्रकार आहेत ते जाणून घेऊया…

ध्वज छायावेध- ध्वज, स्तूप, समाधी किंवा स्तंभाच्या सावली मुळे रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ध्वज छायावेधानुसार, मंदिरापासून 100 फूट आत बांधलेली घरे ध्वज छायावेधाच्या आत येतात.

पण जर मंदिराची उंची कमी असेल आणि त्याच्या ध्वजाची सावली घरावर पडत नसेल तर त्याचा घरावर कोणताही परिणाम होणार नाही. जर ध्वजाच्या दुप्पट उंची इतकी जागा सोडून घर बांधले गेले असेल, तर त्यामुळे वास्तू दोष निर्माण होत नाही.

मंदिर छायावेध – मंदिराची सावली देखील वास्तु दोषांचे कारण असू शकते. जर कोणत्याही घर, दुकान, कारखाना किंवा व्यावसायिक संस्थेवर कोणत्याही मंदिराची सावली दोन तासांपेक्षा जास्त पडली, तर वास्तू दोष आहे. जर कोणत्याही मंदिराची सावली सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत घरावर पडली तर छायावेधात येते. यामुळे ग्रह समस्या, व्यवसायात नु’कसान आणि लग्नाला विलंब होऊ शकतो.

पर्वत छायावेध – छाया वेधानुसार पूर्व दिशेला असलेल्या कोणत्याही पर्वत किंवा उंच इमारतीची सावली तुमच्या घरावर पडली तर ती अशुभ मानली जाते. यामुळे जीवनात प्रतिष्ठा कमी होते आणि यशामध्ये अडथळा निर्माण होतो. या सावलीचा पूर्व वगळता इतर दिशांवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे डोंगराळ भागात घर बांधताना, घराच्या पूर्व बाजूस कोणताही डोंगर येऊ नये याची काळजी घ्यावी, पूर्वेकडील पर्वतामुळे घरात पूर्वेकडील दिशेने येणारा प्रकाश अडवला जातो.

इमारत छायावेध – जर तुमच्या घराभोवती बोरिंग किंवा विहीर असेल तर त्यावर पडणारी सावली छायावेधात येते. विहिरीच्या पाण्यात सूर्यप्रकाश पडल्याने जीवाणू आणि कीटक मरतात, विहिरीत प्रकाश नसल्यास, ते पाणी पिल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. असे मानले जाते की जर एखाद्याच्या घरावर दुसऱ्या घराची सावली पडली तर कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा विनाश होऊ शकतो.

वृक्ष छायावेध- वृक्ष छाया वेधानुसार जर झाडाची सावली सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घरावर पडली तर ते अशुभ मानले जाते, परंतु त्यामध्ये दिशेचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जीवनात अपयश येते. घराच्या आग्नेय दिशेला वड, पिंपळ, गुलमोहर आणि उंबर वृक्ष असल्याने जीवनात समस्या निर्माण होतात. यामुळे व्यक्तीचा मृ’त्यू देखील होऊ शकतो.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स