या दोन रत्नांमध्ये आहे नशिब बदलण्याची धमक, त्यांचे चमत्कारीक फायदे जाणून घ्या…!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, ज्योतिष व रत्नशास्त्राचे अद्वितीय व अतूट असे नाते आहे. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली रत्ने ज्योतिषशास्त्रात अतिशय विशेष मानली जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व १२ राशींसाठी एक विशिष्ट रत्न आहे, जे त्या राशीचे स्वामी आणि त्यांच्या स्वभावाच्या आधारे ठरविले जाते. ही रत्ने परिधान केल्यास अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, राशीच्या रत्नांचा व्यक्तीच्या जीवन आणि नशिबावर मोठा प्रभाव असतो. ही रत्ने सौर मंडळात उपस्थित असलेल्या ग्रहांचा भाग मानली जातात. असे मानले जाते की राशीनुसार रत्न धारण केल्यास व्यक्तीचे भाग्य बदलू शकते. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच दोन प्रभावी रत्नांबद्दल सांगणार आहोत.

गोमेद आणि गोदंती रत्नांचे विशेष महत्त्व ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे. गोमेद हे राहुचे रत्न मानले जाते. गोमेद रत्न धारण केल्याने राहुची स्थिती मजबूत होते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूची स्थिती वाईट असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गोमेद रत्न धारण करावे.

तथापि, गोमेद घालण्यापूर्वी ज्योतिष शास्त्रीय सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गोदंती रत्न हे चंद्राचे रत्न मानले जाते. ते परिधान केल्याने चंद्रदोष संपतो. गोमेद आणि गोदंती रत्ने घालण्याचे फायदे जाणून घेऊया –

गोमेद रत्न धारण करण्याचे फायदे –

गोमेद हा सूर्याचा उपग्रह मानला गेला आहे. या रत्नाला माणिकाच्या जागेवर घालू शकता. हा रत्न याकुब व रक्तमणी नावाने सुद्धा ओळखला जातो. हे रत्न लाल रंगाचे असून भरीव असते. हे रत्न स्वस्त असल्यामुळे सर्व ठिकाणी उपलब्ध असते.

या रत्नाला शुक्ल पक्षेतील रविवारी सकाळी तांब्यात गाठून अनामिकेत धारण केले पाहिजे. या रत्नाला धारण केल्याने सौभाग्यात वाढ, स्वास्थ्यात लाभ, मान-सन्मानाची प्राप्ती होते. यात्रा फलदायी ठरते. मानसिक ताण तणाव दूर होतात. मनातील शंका कुशंकेला दूर जातात.

लाल रंगाचा गोमेद आजारपणात फायदेशीर ठरतो तर पिवळ्या रंगाचा गोमेद कावीळ या आजारपणात लाभदायक आहे. याला धारण केल्याने वीज पडली तरी त्याचा परिणाम होत नाही. यात्रेत कुठलीही हानी होत नाही, अशी समजूत आहे.

जर एखादी व्यक्ती वकिली, न्याय आणि राजकारण क्षेत्रात काम करत असेल आणि त्यात आणखी यश मिळवायचे असेल तर त्याने गोमेद रत्न धारण केले पाहिजे.

जर व्यक्तीच्या कुंडलीचे केंद्र म्हणजेच 1, 4, 7, 10 व्या स्थानात राहू विराजमान असेल तर गोमेद धारण करणे फायदेशीर आहे.

राहू सहाव्या आणि आठव्या घरात किंवा आरोहात असल्यास गोमेद धारण करावा.

जर राहू शुभ घरांचा स्वामी असेल आणि स्वतः कुंडलीच्या सहाव्या किंवा आठव्या घरात स्थित असेल तर अशा लोकांनीही गोमेद धारण केले पाहिजे.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू त्याच्या दुर्बल राशीत असेल म्हणजे धनु राशीत असेल, तर गोमेद रत्न धारण करणे खूप फायदेशीर मानले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार राहूला मकर राशीचा स्वामी म्हटले जाते, त्यामुळे गोमेद धारण करणे मकर राशीच्या लोकांसाठीही शुभ मानले जाते.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूचा शुक्र, बुध सह संयोग असेल तर त्या व्यक्तीने गोमेद धारण करावे.

गोदंती रत्न धारण करण्याचे फायदे –

गोदंतीला चंद्राचे रत्न मानले जाते आणि त्याची राशी कर्क आहे. गोदंती रत्न चंद्रकांता मणी म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, गोदंती रत्न धारण केल्याने चंद्राचे वाईट परिणाम संपतात.

हे रत्न धारण केल्याने मन शांत होते आणि मानसिक ताण कमी होतो. ते परिधान केल्याने जीवनात सकारात्मकता येते.

गोदंती रत्न धारण करणे करियर आणि व्यवसायासाठी देखील फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की गोदंती रत्न धारण केल्याने व्यक्तीला नवीन संधी प्राप्त होतात.

गोदंती रत्न धारण केल्याने व्यक्तीचे भाग्य चमकू शकते. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीसमोर यशाचे नवे मार्ग खुले होतात.

हे एक भाग्यवर्धक रत्न आहे जे आजूबाजूला काहीही नकारात्मक होण्यापासून प्रतिबंधित करते. ते परिधान केल्याने सहावे इंद्रिय जागृत होते आणि आगामी घटनांचे पूर्वचित्रण होते.

हे प्रवाशांनी विशेषत: पाण्यात प्रवास करणाऱ्यांनी ते स्वतःच्या सुरक्षेसाठी परिधान केले पाहिजे.

हे रत्न कलाकारांसाठी आणि जे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

प्रेम आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये फायदे देते. प्रेमीं साठी हे सर्वोत्तम रत्न आहे, ते परिधान केल्याने एकाग्रता राहते.

ज्यांच्या कुंडलीत चंद्रासोबत केतू आहे त्यांच्यासाठी हे रत्न रामबाण औषध आहे, हे रत्न धारण केल्याने केतूमुळे होणारे ग्रहण दोष आपोआप दूर होतात.

जर कुंडलीत चंद्र कमकुवत असेल आणि यामुळे तुमचे धन टिकत नसेल तर तुम्ही हे रत्न धारण करावे.

जे नेहमी आपल्या आईशी मतभेद करतात, ते परिधान करू शकतात. जे भगवान शंकराचे भक्त आहे त्यांनी हे रत्न धारण केलेच पाहिजे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment