या महाशिवरात्रीला असा धारण करा रुद्राक्ष.. महादेवांचा आशीर्वाद लाभेल..!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… कितीही प्रयत्न करुन जर कधी तुम्हाला तुमच्या एकाही कामात यश मिळत नसेल किंवा तुमची प्रगती खुंटली असेल, प्रगतीच होत नसेल? तर भगवान शंकराचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि आयुष्याला योग्य दिशा मिळण्यासाठी रुद्राक्षापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे काहीही असूच शकत नाही. यामुळेच शिवभक्त केवळ महादेवांच्या पूजेतच ते अर्पण करत नाहीत, तर गळ्यात, बाहूतही परिधान करतात. असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे.

यामुळेच रुद्राक्ष अतिशय पवित्र आणि शुभ फल देणारे मानले जाते. सर्व पुराणात रुद्राक्षाचा महिमा सांगितला आहे. रुद्राक्ष अनेक प्रकारचे रुद्राक्ष आहेत. वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या पट्ट्यांसह, हा रुद्राक्ष नवग्रहांशी देव-देवतांशी संबंधित आहे. या प्रत्येक मुखी रुद्राक्षात एक वेगळा गुण असतो. यामुळेच वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळे रुद्राक्ष धारण करण्याचा नियम सांगण्यात आला आहे. जर तुम्हाला कामात यश हवे असेल तर या महाशिवरात्रीला तुमच्या राशींप्रमाणे रुद्राक्ष धारण करा.

रुद्राक्षाचे धार्मिक महत्त्व – भगवान शंकराची आराधना करून विशेष आशीर्वाद मिळणाऱ्या वस्तूंमध्ये रुद्राक्षापेक्षा श्रेष्ठ काहीही असू शकत नाही. अशा वेळी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मनाची असावी असे तुम्हाला वाटत असेल तर या महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करा. यामुळे व्यक्तीचे सर्व रोग, दुःख, भीती दूर होऊन जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या अश्रूंपासून बनवलेल्या रुद्राक्षात देखील एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवाचे सौभाग्यमध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते.

राशींनुसार असा रुद्राक्ष धारण करा – ज्योतिषशास्त्रानुसार ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ग्रहांची शुभ प्राप्ती होण्यासाठी वेगवेगळी रत्ने धारण केली जातात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळ्या क्रमांकाचे रुद्राक्ष धारण केले जातात. 12 राशींशी संबंधित रुद्राक्षांबद्दल जाणून घेऊया.

♈ मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींना तीनमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला जातो. अग्निरुपात असलेला हा तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही, असे मानले जाते. तीनमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तहान व भूकेवर विजय प्राप्त करता येतो. बुद्धी कुशाग्र होते, असे सांगितले जाते. मेष राशीच्या लोकांनी सौभाग्य प्राप्तीसाठी एक मुखी, तीन मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष धारण करावे. हे रुद्राक्ष धारण केल्यावर तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम लगेचच दिसायला लागतात.

♉ वृषभ रास – वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याचे मानले जाते. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सहामुखी रुद्राक्ष धारण करावे, असा सल्ला दिला जातो. सहामुखी रुद्राक्षाची कार्तिकेय स्वरूपात गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो. या रुद्राक्षावर माता पार्वती व माता लक्ष्मीची सुद्धा कृपादृष्टी असते. काही जण या रुद्राक्षाला विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी हा रुद्राक्ष प्राधान्याने धारण करतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही.

♊ मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांनी सौभाग्य जागृत करण्यासाठी नेहमी चतुर्मुखी, पाचमुखी आणि तेरा मुखी रुद्राक्ष धारण करावे. मिथुन राशीचा स्वामी बुध मानला गेला आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो. चारमुखी रुद्राक्ष पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही, अशी मान्यता आहे. चारमुखी रुद्राक्ष ब्रम्हदेवाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. याचा प्रभाव धारणकर्त्याच्या वाणीवर होतो. अल्पावधीतच तो वक्ता दशसहस्त्रेषु होऊ शकतो. चारमुखी रुद्राक्ष धारण केल्यास स्मरणशक्ती तीव्र होते, असे सांगितले जाते.

♋ कर्क रास – कर्क राशीच्या लोकांनी नियमानुसार पूजा केल्यावर त्रिमुखी, पाचमुखी किंवा गौरी-शंकर रुद्राक्ष धारण करावा. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याचे मानले जाते. कर्क राशीच्या व्यक्तींनी दोनमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो. दोनमुखी रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते. दोनमुखी रुद्राक्ष अर्धनारी नटेश्वरचे प्रतीक असल्याची मान्यता आहे. हा धारण केल्यास व्यक्तिमत्त्वात अमुलाग्र बदल होतो. धारणकर्त्याची कुण्डलिनी जागृत करण्याचा मार्ग सुलभ होतो. पती-पत्नीमधील ऐक्य, वैवाहिक सौख्य, दु:खनाश, मनःशांती, उद्योगधंदा व प्रगतीसाठी दोनमुखी रुद्राक्ष धारण करणे लाभदायक असल्याचे सांगितले जाते.

♌ सिंह रास – एक मुखी, तीन किया मुखी आणि पाच मुखी रुद्राक्ष सिंह राशीच्या लोकांचे सौभाग्य वाढवण्यासाठी खूप शुभ सिद्ध होतात. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याचे मानले जाते. सिंह राशीच्या व्यक्तींनी बारामुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यस्वरूपी असलेल्या बारामुखी रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. बारामुखी रुद्राक्ष महाविष्णू तसेच १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतीक मानाला गेला आहे. बारामुखी रुद्राक्ष धारण केला असता व्यक्तिमत्व तेजपुंज होते. शत्रूघात व अपघातपासून रक्षण होते, असे सांगितले जाते. बारामुखी रुद्राक्ष अत्यंत अनमोल असून, हे धारण केल्याने अनेक लाभ प्राप्त करून घेता येऊ शकतात, असे सांगितले जाते.

♍ कन्या रास – कन्या राशीच्या लोकांसाठी नियमानुसार पूजा केल्यानंतर चार मुखी, पाच मुखी आणि तेरा मुखी रुद्राक्ष धारण करणे खूप शुभ असते. कन्या राशीचा स्वामी बुध मानला गेला आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्ष धारण करावा, असे सांगितले जाते. चारमुखी रुद्राक्षाच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही, असे सांगितले जाते. चारमुखी रुद्राक्ष ब्रम्हदेवाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. याचा प्रभाव धारणकर्त्याच्या वाणीवर होतो. अल्पावधीतच तो वक्ता दशसहस्त्रेषु होऊ शकतो. चारमुखी रुद्राक्ष धारण केल्यास स्मरणशक्ती तीव्र होते, असे सांगितले जाते.

♎ तुळ रास – तुळ राशीच्या लोकांनी चतुर्मुखी, सहामुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर जीवन-प्रतिष्ठा प्राप्त करून सौभाग्य प्राप्त करावे. तुळ राशीचा स्वामी शुक्र असल्याचे मानले जाते. तुळ राशीच्या व्यक्तींनी सहामुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो. सहामुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरुप मानला गेला आहे. सहामुखी रुद्राक्ष शक्तीवर्धक समजला जातो. हा रुद्राक्ष धारण करणाऱ्यावर पार्वती व लक्ष्मीची देवीची कृपादृष्टी राहते. काही जण या रुद्राक्षाला विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी हा रुद्राक्ष प्राधान्याने धारण करतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही, अशी मान्यता आहे.

♏ वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या राशीच्या राशीच्या व्यक्तीने आपले झोपलेले भाग्य जागृत करण्यासाठी जीवन-प्रतिष्ठा मिळाल्यानंतर त्रिमुखी, पंचमुखी किंवा गौरी-शंकर रुद्राक्ष धारण करावे.वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याचे मानले जाते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तीनमुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो. अग्निरुपात असलेला हा तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही, असे मानले जाते. तीनमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तहान व भूकेवर विजय प्राप्त करता येतो. बुद्धी कुशाग्र होते, असे सांगितले जाते. मनोवांच्छित इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कार्यक्षेत्रात यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होण्यासाठी तीनमुखी रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते.

♐ धनु रास – धनु राशीच्या लोकांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर एक मुखी, तीन मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष धारण करावेत. धनु राशीचा स्वामी गुरु असल्याचे मानले गेले आहे. धनु राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो. पंचमुखी रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यू येत नाही, अशी मान्यता आहे. पंचानन शिवाचे प्रतीक मानला जातो. पंच महाभूतंचा यात समावेश असल्याचे सांगितले जाते. हा रुद्राक्ष धारणकर्त्याला मनःशांती प्रदान करतो. यात सर्व रुद्राक्षाचे गुण विद्यमान असतात. हा रुद्राक्ष सर्वार्थाने उत्कृष्ट असतो.

♑ मकर रास – मकर राशीच्या लोकांनी नेहमी चतुर्मुखी, सहामुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष धारण करून विधिवत पूजन करावे. मकर राशीचा स्वामी शनी असल्याचे मानले गेले आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी सातमुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो. सातमुखी रुद्राक्षाच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात, असे सांगितले जाते. हा रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे. हा रुद्राक्ष सप्त मातृका, अनंत नागाचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. हा रुद्राक्ष धारण करणाऱ्याला सरस्वती देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने दीर्घायुष्य व अपघातापासून रक्षण मिळते. तसेच मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर बरा होतो. सर्पदंशापासून रक्षण होते, असे सांगितले जाते.

♒ कुंभ रास – कुंभ राशीच्या लोकांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी चार मुखी, सहा मुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष रुद्राक्ष धारण करावेत. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्याचे मानले जाते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी सातमुखी रुद्राक्ष धारण करावे, असा सल्ला दिला जातो. सातमुखी रुद्राक्षाच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. हा रुद्राक्ष सप्त मातृका, अनंत नागाचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. हा रुद्राक्ष धारण करणाऱ्याला सरस्वती देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. दीर्घायुष्य व अपघातापासून रक्षण मिळते. याच्या धारणाने मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर बरा होतो. सर्पदंशापासून रक्षण होते, असे सांगितले जाते.

♓ मीन रास – मीन राशीच्या लोकांनी सौभाग्य प्राप्तीसाठी नेहमी त्रिमुखी, पंचमुखी किंवा गौरी-शंकर रुद्राक्ष धारण करावे. मीन राशीचा स्वामी गुरु असल्याचे मानले गेले आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो. पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे. हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. आर्थिक पक्ष मजबूत होण्यास मदत होते, असे सांगितले जाते. हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यू येत नाही, अशी मान्यता आहे. पंचानन शिवाचे प्रतीक म्हणून या रुद्राक्षाकडे पाहिले जाते. पंच महाभूतंचा यात समावेश असल्याची मान्यता आहे. हा रुद्राक्ष धारणकर्त्याला मनःशांती प्रदान करतो. यात सर्व रुद्राक्षाचे गुण विद्यमान असतात. सर्वार्थाने उत्कृष्ट असतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment