Saturday, June 10, 2023
Homeअध्यात्मया 3 गोष्टी आपल्यासाठी पैशापेक्षा सर्वोपरी असायला हव्यात, पैसा असावा दुय्यम स्थानी..!!

या 3 गोष्टी आपल्यासाठी पैशापेक्षा सर्वोपरी असायला हव्यात, पैसा असावा दुय्यम स्थानी..!!

मित्रांनो, आयुष्यात या 3 गोष्टी आपल्या साठी पैशांपेक्षाही अधिक मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण आहेत, आणि असायलाही हव्यात.. त्यांच्याशिवाय आपले जीवन निरर्थक आहे..!!

मित्रांनो, जगातील प्रत्येक गोष्ट पैशात मोजता येत नसते. जवळ पैसा असणे देखील तितकेच महत्वाचे आहे परंतु पैसा म्हणजे सर्वस्व नसते.

नीतिशास्त्र पंडीत आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार माणसासाठी पैश्यापेक्षाही अधिक मौल्यवान आणि महत्वाच्या गोष्टीही या भूतलावर अस्तित्वात आहेत.

आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांची धोरणे प्रभावी ठरत आहेत. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे अनुसरण करून लोक अफाट यश संपादन करतात.

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार संपत्ती संपल्यानंतरही येते, पण एकदा जर या गोष्टी गेल्या तर कधीही परत येत नाहीत.

म्हणूनच माणसाने पैशापेक्षा या कही गोष्टींना महत्वं द्यायला हवे. चला तर मित्रांनो, आचार्य चाणक्य यांच्या मते पैशापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण आज बघूया…!!

आपला धर्म पैशापेक्षा जास्त मूल्यवान आहे –

आचार्य चाणक्य यांच्या मते आपला धर्म हा कोणत्याही धन संपत्तीपेक्षा सर्वोपरी असायला हवा. इतर कोणत्याही बाबी त्यासमोर दुय्यम ठरतील. म्हणूनच आचार्य चाणक्य असे म्हणतात की, माणसाने धर्म कधीही सोडू नये.

माणसाने नेहमीच धर्माच्या मार्गाचा अवलंब करायला पाहिजे. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला आयुष्यात मान, सन्मान सर्व काही मिळत असते. धर्मासाठी पैशाचा त्याग करण्यामध्ये काहीच गैर नाही.

प्रेम पैशापेक्षा मौल्यवान आहे –

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार प्रेम पैशापेक्षा अधिक मूल्यवान आहे. प्रेमाच्या बदल्यात तुम्ही जर तुम्ही कुणीतरी दिलजले पैसे नाकारलेत तर त्यात काहीही गैर नाही.

मित्रांनो, आपण पैसे हवे तेवढे कमवू शकता परंतु त्या पैशाने आपण एखाद्याचे प्रेम कधीही विकत घेऊ शकणार नाही.

म्हणूनच मित्रांनो, आपण नातेसंबंधांचे महत्त्व नेहमीच समजून घ्यायला हवे. प्रेमासाठी जरी तुमचे पैशाचे नुकसान झाले तरीही काही हरकत नाही.

पैशापेक्षा कितीतरी पटीने अधिक मूल्यवान तुमचा आत्मसन्मान आहे –

मित्रांनो आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा स्वाभिमान हा पैशापेक्षा नेहमीच महत्वाचा असतो.

पैसा मिळविण्यासाठी आपला आपला आत्मसन्मान कधीही गहाण ठेऊ नये. कदाचित तुम्हाला हरवलेले पैसे परत मिळू शकतील परंतु तुम्हाला एकदा गमावलेला स्वाभिमान परत मिळविणे केवळ अशक्य आहे.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स