भारतातील या मंदिरात अजूनही आहे साक्षात भगवंतांचे वास्तव्य : अनेक र’हस्यांनी भरपूर आहे हे मंदीर.. या मंदीरातील मूर्तीला घामही येतो..!!

भारतातील या मंदीरात अजुनही साक्षात भगवंताचे वास्तव्य आहे. जाणून घ्या जगप्रसिध्द तिरुपती बालाजीच्या मंदिरातील हे १० र ह स्य ज्याला वैज्ञानिक सुद्धा आजपर्यंत नाही सोडवू शकले..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, भारतभूमी देव देवतांची पावन भूमी मानली जाते. येथे अनेक ठिकाणी देवांनी वास्तव्य केल्याचे पुरावे देखिल सापडले आहेत. आपल्या पवित्र चरणांनी देवतांनी ह्या धर्तीला पुण्यावंतांची भूमी बनविले आहे. सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असलेले विविध मंदिरं या भूमीवर आजही अगदी सही सलामत उभीआहेत.

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका मंदिराबाबत सांगणार आहोत जे खूप जागृत देवस्थान मानलेजाते. त्याची कारणे ही तशीच आहेत. आपण बोलतोय जगप्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिराबद्दल. हे जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर आहे. या मंदीराची न उमगलेले र ह स्य आजतागायत कोणीही सोडवू शकले नाही. ती र ह स्य काय आहे ते वाचुन तुम्हालाही नक्किच आश्चर्य वाटेल.

(1) असे म्हटले जाते की या मंदिरात नुसती दगडाची मुर्ती नसून साक्षात भगवान श्रीव्यंकटेश बालाजी वास्तव्यास असतात. श्री व्यंकटेश भगवान श्री विष्णु यांचाच अवतारआहे. ही मुर्ती कोणी घडवलेली नसून ती स्वयंभु मुर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर खरोखरचे केस आहेत, ते अगदी रेशमी मुलायम आणि सरळ आहेत. विशेष म्हणजे त्या केसांचा कधीच गुंता होत नाही किंवा ते कधी खराब देखिल होत नाही.

(2) दुसरे र ह स्य म्हणजे भगवान तिरुपती बालाजी यांच्या मूर्तीला निट कान लावून ऐकल्यास त्यातून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकु येतो.

(3) मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ एक अद्भुत छडी आहे असे म्हटले जाते की बाल-अवस्थेत असताना या छडीने बालाजींना मारताना त्यांच्या हनुवटीला ज ख म झाली आणि प्रत्येक शुक्रवारी ही ज ख म भरून येण्यासाठी देवाच्या हनुवटीला हळदीचंदन लेप लावला जातो.

(4) एक खुपच चमत्कारिक र ह स्य जे अजूनही कोणाला समजु शकले नाही ते म्हणजे मुर्तीच्या डोक्याचे तापमान इतके जास्त असते की मूर्ति अक्षरशः घामाने ओली होऊन जाते. त्यासाठी मुर्तीच्या आसपास पंखे लावले आहेत आणि गाभारा कायम थंड राहील अशी काळजी घेतली जाते.

(5) एक अनाकलनीय र ह स्य म्हणजे मंदिराच्या आतील भागात सदैव तेवत असणारा दिवा. मंदिरात एक असा अद्भुत दिवा आहे जो कित्येक वर्षांपासून तेला किंवा तूपाशिवाय अहोरात्र तेवत असतो. हा दिवा कोणी व कधी लावला या बद्दलचे गु पि त अध्यापही उलगडलेले नाही.

(6) जेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा श्री व्यंकटेश यांची मुर्ती अगदी समोर म्हणजे मध्यभागी दिसेल आणि गाभाऱ्याच्या बाहेरून बघितल्यास मुर्ती आपल्या उजव्या बाजूस दिसते. आहे ना हा चमत्कार.

(7) मंदिरात जाळले जाणारे प च यी कापूर हे अत्यंत सुवासिक कापूर आहे आणि हे फक्त बालाजी मंदिरातच पहायला मिळते.

(8) त्यानंतरच अगदी चमत्कारिक र ह स्य म्हणजे भगवान व्यंकटेश यांच्या हृदयाच्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता विराजमान असल्याचे दिसते. हे आपल्याला तेव्हा दिसते जेव्हा गुरुवारी देवाच्या मूर्तीचा सगळा शृं गा र काढला जातो आणि मुर्तीला दुधाने स्ना न घातले जाते. त्यावर चंदनाचा लेप लावतात. तो लेप काढताना भगवान बालाजींच्या छातीवर साक्षात लक्ष्मी मातेची छबी विराजमान असल्याचे चिन्ह स्पष्ट दिसते.

(9) बालाजी भगवान यांना व स्त्र परिधान करताना वरील अर्ध्या भागावर साडी घालतात आणि कमरेच्या खालच्या बाजूस पीतांबर नेसवतात. या मागच कारण म्हणजे मूर्तीमध्ये साक्षात् माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघे ही वास्तव्य करतात.

(10) त्यांनतरचे महत्वाचे र ह स्य म्हणजे मंदिरापासून थोड्याशा अंतरावर वसलेले एक पुरातन असे खेडेगाव. मंदीरात लागणारे फळे, दूध, दही, तूप हे सर्व केवळ या गावातूनच मागवले जाते. बाहेरील व्यक्तींना या गावात येण्यास सक्त मनाई आहे.

खूप लांबून लांबून भक्त बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात यासाठी भक्तनिवास देखिल आहेत. मंदीरात रोज तीन लाख लाडू बनविले जातात तेही शुध्द तूप वापरून. मंदिरातील भक्तांसाठी प्रसादालय असुन तेथे अतिशय उत्तम असे भोजन बनविले जाते.

आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर स्त्री, पुरुष, बालक हे श्रध्देने येथे आपले केशदान करतात. यामागे एवढीच श्रद्धा असते की आपल्यातील अहंकार, लोभ, मत्सर यांचा आपण आजपासून त्याग करून एक पवित्र आणि शांत, समाधानी जीवन जगणार आहोत.

तर मित्रांनो अशा या अद्भुत आणि पवित्र मंदिराला आपण नक्की भेट द्या आणि भगवान व्यंकटेश बालाजी यांच्या र ह स्यां बद्दल स्वतः अनुभूती घ्या. आपल्या सर्व मनोकामना बालाजी अवश्य पुर्ण करतील.
गोविंदा… गोविंदा.. व्यंकट… रमणा… गोविंदा…!!

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment