नवरात्री शुक्रवार.!! लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की करा हा बेलपत्राचा उपाय..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. घटस्थापना म्हणजे एका मडक्यामध्ये धान्य पेरले जाते त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ व सकाळ संध्याकाळी आरती केली जाते. शुक्रवार हा देवी आईचा वार आहे, म्हणून शुक्रवारीचे देवीचे पूजन करतात त्यांना जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

त्यांना सर्व प्रकारचे सुख आणि संपदा व समृद्धी मिळते,असे सांगितले जाते. कारण देवी लक्ष्मी घरातील महिलेच्या रुपात लक्ष्मी म्हणून कार्यरत असते, प्रत्येक स्त्रीमध्ये देवी लज्या, क्षमा, शील, स्नेह तसेच ममता रुपात वास्तव्य करीत असते. त्यामुळे तुम्ही या नवरात्री मध्ये माता देवीला प्रसन्न करण्यासाठी हा खूप छान प्रभावी असा उपाय नक्कीच केला पाहिजे.

जर आपल्याला जीवनात भरपूर धनसंपदा मिळवायचे असेल, भरपूर पैसे मिळवायचे असेल, आपली आर्थिक स्थिती बळकट करायचे असेल, आपलं धन वाढवायचे असेल, तर हा खूप सुंदर उपाय आहे.हा चमत्कारिक उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे. यासाठी शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर बेलाच्या झाडाखाली जावे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक शुद्ध तुपाचा दिवा बरोबर घेऊन जावे. शुक्रवारी संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली बसून, बेलाच्या झाडाचे पूजन करावे व मनोभावे नमस्कार करून आपण सोबत आणलेल्या शुद्ध तुपाचा दिवा बेलाच्या झाडाखाली लावून द्यावा.

कारण बेलाच्या झाडाचे खूप महत्त्व आहे. बेलाच्या झाडामध्ये साक्षात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असल्याचे मानले जाते, याशिवाय तसेच संध्याकाळच्या वेळी देवी स्वतः तेथे प्रकट झालेली असते, म्हणून आपण जर देवी आईच्या प्रिय वार म्हणजे शुक्रवारी देवीसमोर दिवा लावल्यास, देवी आपल्यावर खूप प्रसन्न होते. हा उपाय आपल्याला पाच शुक्रवार करायचा आहे. मग दिवा लावल्यानंतर मनोभावे नमस्कार करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. हा खूपच जबरदस्त उपाय आहे.

हा उपाय केल्याने आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल होत जाईल, पैशांची आवक वाढेल. याशिवाय अडलेल्या पैसा येऊ लागेल. आर्थिक अडचण भेडसावणार नाही. पैसा आकर्षित होईल, हा उपाय आपल्याला फक्त पाच शुक्रवारपर्यंत करायचा आहे. नवरात्र काळात ते शुक्रवारपासून जर आपण या उपायाचा आरंभ केला, तर ते खूपच परिणाम आपल्याला दिसू लागते.

टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment