प्रेमात मुलीच सर्वात जास्त धोका देतात.. हे लॉजिक खरं आहे का.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, मुलांना अनेकदा नव्यानं ओळख झालेल्या मुलींचे संपर्क क्रमांक हवे असतात. मुलीही चटकन नंबर देतात. मात्र, मुलांनी त्यावर कॉल करण्याचा प्रयत्न केला, की ते क्रमांक चुकीचे असल्याचं लक्षात येतं किंवा पलीकडे भलतीच व्यक्ती असते. एखाद्याला नंतरच्या आयुष्यात टाळण्यासाठी अनेकजणी हे सर्रास करतात. एखादा मित्र खूप जवळचा नसतो; पण त्याच्याबरोबर थोडा वेळ काढायला मुलींची हरकत नसते. अशा वेळी बारीकसारीक कामं करण्यासाठी त्या अशा मुलांना पकडतात.

केवळ ती कुणीतरी, आपल्याला मैत्रीण म्हणून खूप जवळची वाटणारी मुलगी आपल्याबरोबर गाडीवर बसून कुठेतरी येते आहे, एवढंही त्या मुलाला पुरेसं असतं. त्यामुळे तोही तिला लगेच लिफ्ट द्यायला तयार होतो. मग भूक लागली, म्हणून सँडविच, एखादी कॉफी इथपासून पेट्रोलचा खर्चही त्यानंच करण्यापर्यंत मजल जाते. तेव्हा अशा फुकट्या मुलींपासून सावधान! किंवा मग तुमची मैत्री तरी खरी आहे, हे एकदा तपासून घ्या.

त्याचबरोबर काही मुलींना आयुष्यात एकटं राहायला अजिबात आवडत नाही. त्यांना सतत कुणीतरी सोबत हवं असतं. विशेषतः कायमच रिलेशनशीपमध्ये राहाणाऱ्या मुलींच्या बाबतीत तर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते. एखादा आधीचा जोडीदार आवडला नाही किंवा नकोसा झाला, तर दुसरा कुणी त्यांच्या आयुष्यात आल्याशिवाय त्या आधीच्या बॉयफ्रेंडला व्यवस्थित धोका ही देत नाहीत किंवा सांगून आणि नीट संवाद साधून बाजूलाही होत नाहीत. आपल्या बाबतीत असं घडतंय का, याची वेळीच शहानिशा करा.

आणि त्याच बरोबर आपल्यातील बऱ्याच मुलांना मुली रडलेल्या सहन होत नाहीत आणि हवं ते मिळवण्याची हीच एक संधी आहे, हे लक्षात घेऊन काही मुली नेमक्या याच गोष्टीचा गैरफायदा घेतात. अशाप्रकारे आपला फायदा घेऊ द्यायचा की नाही, याचा विचार ही मुलांनी केला पाहिजे.

लटक्या रागानं रुसणाऱ्या मुलींप्रमाणेच आपल्या जोडीदाराला भावनिक पद्धतीनं हवा तसा वापर करणाऱ्या मुली भर रस्त्यात किरकोळ कारणावरूनही आपल्या जोडीदाराला मारताना दिसतात. कधीतरी दिलेली एखादी चापटी एवढ्यापुरतंच ते मर्यादित न राहाता खांद्यावर किंवा पाठीवर मारलेल्या बुक्क्यापर्यंत त्याची मजल जाते. सार्वजनिक ठिकाणी जोडीदार आपल्या अंगावर धावून येणार नाही, याची मुलींना खात्रीच असते. त्यामुळे मोठमोठ्यानं वाद घालणं, शिवीगाळ करणंही मुलींकडून केलं जातं. अशा मुलींना वेळीच ओळखून मुलांनी बाजूला व्हा.

परंतु मित्रांनो प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं आणि म्हणूनच विश्वासघात हा प्रेमासाठी खूप घातक आहे. ब्रेकअप झाल्यानंतर त्या नात्यातून बाहेर पडणं कठीण जातं, परंतु याच ब्रेकअपमुळे माणूस अधिक खंबीर होतो.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Comment